


कोपरगाव प्रतिनिधी
शहरातील खंदक नाला , बस स्टँड मेन रोड प्रमाणे सर्वात जास्त रहदारीचा असणारा संभाजीमहाराज पुतळा ते गोकुळ नगरी ते टाकळी नाका हा रोड मोठा करण्यासाठी व मजबुती करून डांबरी करणासाठी मोठा निधी नगरपालिका कडे असूनही दर्जेदार काम होत नाही , नगरपालिका करत नाही .ही मोठी खेदाची गोष्ट असून , तात्काळ रोड चे कामे सुरू करावे,तसेच रस्ता मोठा करण्यासाठी रस्त्यामध्ये आलेले असलेले अतिक्रमण काढून लवकर काम पूर्ण करावे.या रस्त्यावरून,शाळा हॉस्पिटल,धान्यमार्केट साठी , तसेच शहरालगत असलेले उपनगर या भागातील लोक या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.
निधी असून दर्जेदार गुणवत्तापूर्ण काम पूर्ण न करणे हे नगरपालिकेचे जणू काही ब्रीद वाक्य झाले.जनतेला वेठीस धरायचे यात काय मोठे पन मिळते परंतु नगरपालिकेला हेच समजत नाही.जनतेला काम चालू करा हे सांगावे लागते हे मोठे दुर्दैव आहे.याचाचा अर्थ पालिका प्रशासनाला जनतेला होणाऱ्या त्रासाचा काही देणेघेणे नाही असा होतो.
थंडी चे दिवस चालू झाले आहेत , धूळ आणि खडीचा रोड या मुळे लहान मुले ते जेष्ठ नागरिक यांना त्रास होत आहे. खडी वरून लोक अपघाती पडत आहेत,कधी खडी उडून लोकांना दुखापत होतआहे. गोकुळनगरीच्या पुलाचे काम झाल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूचा रसा डांबरी करणं नं करता तसाच सोडून दिला होता.तसेच गोकुळनगरीच्या वळणावर रस्ता खूप छोटा असून तेथील खड्डा व विचित्र असणारा स्पीड ब्रेकर यातून गाडी काढणे खूप आवघड झाले आहे. टाकळी नाका ते कोळपेवाडी पेट्रोल पंप पर्यंत ही खूप खड्डे झाले आहेत व धूळ उडत आहे. तरी तात्काळ हे कामे नगरपालिकेने चालू करून गुणवत्ता पुर्वक व दर्जेदार करावी अशी मागणी मा.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आपल्या प्रसिद्धी प्रत्रकात केली आहे.



