
कोपरगाव प्रतिनिधी
जेऊरकुंभारी ग्रामपंचायत मध्ये निवडून दिलेल्या महिलां सदस्यां ऐवजी त्यांचे पती कारभार पाहत असल्याची धक्कादायक बातमी हाती आली आहे
सविस्तर वृत्त असे कि ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर महिला सदस्य ग्रामपंचायतकडे न फिरकता घरी असतात व त्याऐवजी त्यांचे पती परमेशवर ग्रामपंचायतमध्ये बसुन गावगाडा चालवण्याचा प्रयत्न करत असतात या अनागोंदी कारभारामुळे गावच्या विकासाला खीळ बसत आहे तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी महेंद्र वक्ते यांनी केली आहे.
असल्या प्रकारामुळे जेऊरकुंभारी गावचा विकास होण्यापेक्षा अधोगतीकडे चाललेला आहे. जेऊरकुंभारी गावच्या व ग्रामपंचायत कामामध्ये महिला सदस्यांऐवजी त्यांचे पतीच गावचा कारभार पाहत आहे. सत्ताधारी हे विरोधकांच्या महिलेच्या पतीला ग्रामपंचायत मध्ये सुद्धा येऊन देत नाही. मात्र ते स्वतः गावच्या कारभारामध्ये ढवळाढवळ करत असतात. त्यांच्या महिला सदस्य उपस्थित न राहता त्यांचे पतीदेवच प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहून मनमानी कारभार करत आहेत. नागरिकांनी मोठ्या विश्वासाने महिला सदस्यांना निवडून दिले आहे या मात्र गावच्या कारभारात त्यांना स्थान मिळत नाही. त्यामुळे सरकारने महिलांना जे आरक्षण दिले आहे. मात्र पतीच्या हस्तक्षेपामुळे मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे. ग्रामपंचायत कारभार सोडाच आनंदाचा शिधा वाटपात देखील पतीराजांचा हस्तक्षेप निदर्शनास आला आहे. असेच जर चालू राहिले तर गावचा विकास कधी होणार हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे? मग जनतेने विश्वास कोणाला कोणावर ठेवायचा ? या प्रकारानंतर नागरीकांचा लोकशाही वर विश्वास राहील का? असाही प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.


