
कोपरगाव प्रतिनिधी
दि. २० आक्टोबर रोजी कोपरगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने टाकळी रोडलगत अचानक आलेल्या पाण्यामुळे शेडमधील व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कांदा पाण्यात वाहुन गेल्याने व्यापा-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
असाच तडाखा गेल्या दोन वर्षापुर्वी झालेल्या अतिवृष्टीतही कांदा व्यापाऱ्यांनाही बसला होता, यावेळीही व्यापा-यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतक-यांकडुन खरेदी केलेला कांदा मातीमोल झाला असुन ओला झाल्याने साठवणुक केलेला कांदाही सडला आहे त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांना फटका बसला आहे तरी
कृषी उत्पादन बाजार समितीने त्या व्यापाऱ्यांना मोठया प्रमाणात आर्थिक मदत मिळावी यासाठी कांदा व्यापारी असोसिएशनच्या वतीने कृषी उत्पादन बाजार समितीला निवेदन देण्यात आले.
निवेदन प्रसंगी कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आप्पासाहेब वक्ते, महेद्र सेठ ठक्कर,ऋषिकेश सांगळे ,सनी भंसाली ,अखिल समदड़ीया , बंडू सरोदे ,सतीश आव्हाड,मोशिन खान ,राजू सांगळे अप्पा सांगले,ललित धाड़ीवाल, स्वप्निल पवार , पप्पू पवार ,उत्सव, गणी बागवान,प्रसाद शर्माले रामा वर्कड,मेजर कोल्हे, गणेश कोल्हेे,गायकवाड़ सेठ ,सुहास गायकवाड़,आजाद ट्रे .आदी उपस्थित होते.



