
कोपरगाव प्रतिनिधी
येथील रयत सेवक व ग्रंथपाल डॉ. राजेंद्र लवांडे यांनी ‘पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या माहितीविषयक गरजा आणि प्रत्यक्ष माहितीचा पुरवठा यामधील अंतराचा एक मुल्यमापनात्मक अभ्यास ‘ या विषयावर सादर केलेल्या प्रबंधास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने (औरंगाबाद) पीएच. डी. प्रदान केली आहे याबददल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. डॉ. राजेंद्र लवांडे यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थीतीत शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या प्रबंधास सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रो. डॉ. दया पाटील (दळवे) यांचे संशोधनपर मार्गदर्शन लाभले. जमीन मशागतीपासुन ते पीक काढणीपर्यंतचे (पोस्ट हार्वेस्टींग) तंत्रज्ञान तसेच शेतमाल बाजारात नेईपर्यंत शेतकऱ्यांच्या माहितीविषयक गरजावर आधारीत चिकीत्सक अभ्यास संशोधन करून त्यामाध्यमातून एकाचवेळी शेतकऱ्यांना वेळेत कृषी विषयक माहिती – सल्ला देता येईल अशा स्वरुपाचे हे संशोधन शेतकऱ्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या चिकीत्सक अभ्यासासाठी डॉ. राजेंद्र लवांडे यांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) चे माजी कुलगुरु डॉ. किसनराव लवांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य भाऊसाहेब राजळे, कोपरगाव आगाराचे माजी सहाय्यक व्यवस्थापक भाऊसाहेब पोटभरे, प्राचार्य डॉ. शंकरराव थोपटे आदींचे विशेष मार्गदर्शन लाभले. डॉ. राजेंद्र लवांडे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बी.एस्सी (रसायनशास्त्र) एम.ए. (समाजशास्त्र), एम.ए (मराठी), यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे एम.लिब उच्च शिक्षीत असुन त्यांनी कोपरगांव व नेवासा तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांच्या माहिती विषयक गरजांचा तुलनात्मक अभ्यास या विषयावरील प्रबंधिका सादर केली असता त्यास यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने (नाशिक) एम.फील पदवी प्रदान केली आहे. डॉ. राजेंद्र लवांडे हे सध्या अहमदनगरच्या राधाबाई काळे महाविद्यालयात ग्रंथपाल या पदावर कार्यरत आहेत त्यांच्या यशाबद्दल राज्यभरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



