Saturday, April 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedसमृद्धी महामार्गाच्या कडेला नाले नसल्याने पूर परिस्थिती!! - माजी संचालक बाळासाहेब चव्हाण...

समृद्धी महामार्गाच्या कडेला नाले नसल्याने पूर परिस्थिती!! – माजी संचालक बाळासाहेब चव्हाण यांचा आरोप

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. समृद्धी महामार्गाच्या कडेला नाले नसल्याने पूर परिस्थिती उद्भवलेली आहे असा आरोप महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब चव्हाण यांनी केला आहे.
दि.२० ऑक्टोंबर रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे जेऊर कुंभरी या भागात ढगफुटी झाली. शेतकऱ्यांचे मोठे प्रमाण नुकसान झाले. या भागातील पूर परिस्थितीची पाहणी करत असताना बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले की, जेऊरकुंभारी गावात काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच संजय वक्ते या शेतकऱ्याच्या शेतातील स्पिंकलर सेट वाहून गेला, काही शेतकऱ्यांच्या कांद्याच्या चाळीत पाणी शिरले. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे सर्वस्वी समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणे मुळे हे घडले आहे असा आरोप बाळासाहेब चव्हाण यांनी केला आहे. समृद्धी महामार्गाचे काम जोरात पण शेतकरी कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. समृद्धी महामार्गाच्या कडेला नाले नसल्यामुळे पाणी निघण्यास जागा नाही. ते पाणी शेतकऱ्यांच्या शेतात व घरात शिरले आहे कालच्या पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ऐन दिवाळीच्या सणास आता तोंडाशी आलेला घास हिसकला जात आहे. महामार्गाच्या भरावासाठी मातीचा वापर करण्यात आला आहे. कालच्या पावसाने भरावाची माती खाली रस्त्यावर व शेतात वाहून गेल्याने रस्त्यावर गाळाचा थर निर्माण झाला आहे. नागरिकांना राहदरीस अडथळा निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी पुलांची बांधणी करण्यात आली परंतु पुलाखाली पाणी काढण्यासाठी कोणतीही सोय केली नाही. पुलाखाली पाणी साचल्याने नागरिकांना प्रवास करण्यास अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. जास्त दिवस पाणी साचल्याने डास व रोगराई निर्माण होत आहे. ते पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाते व शेत नापीक होण्याच्या मार्गावर आहे तेव्हा प्रशासनाने समृद्धी महामार्गाच्या कडेला नाल्यांची निर्मिती करावी अशी मागणी संचालक
बाळासाहेब चव्हाण यांनी केली.
पुर परिस्थितीची पाहणी प्रसंगी महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब चव्हाण, सरपंच महासंघाचे कोपरगाव तालुका अध्यक्ष जालिंदर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य यशवंतराव आव्हाड, प्रदीप गायकवाड, संजय वक्ते, सतिश गोसावी, वसंत दादंडे, कानिफनाथ वक्ते आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!