
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावातील जालिंदर रावसाहेब चव्हाण यांची अखिल भारतीय सरपंच महासंघ कोपरगाव तालुकाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल आज २४ सप्टेंबर रोजी श्रिरामपुर या ठिकाणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी जालिंदर चव्हाण यांचा सत्कार करून
गौरव केला तसेच चव्हाण यांनी आजवर केलेल्या समाजीक कार्यचे कौतुक केले. व आपल्याला मिळालेल्या पदाचा जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोग करावा असा सल्लादेखील दिला. सदर प्रसंगी चव्हाण यांनी जेऊर कुंभारी गावातील गोदावरी तीरी घाट बांधण्याचा तसेच गावातील अंतर्गत रस्ते डांबरीकरणाचे प्रस्ताव खासदार लोखंडे यांच्याकडे सादर केले यावेळी जनहिताच्या कामासाठी आपल्याकडून पूर्णपणे सहकार्य राहील असे आश्वासन यावेळी खासदार लोखंडे यांनी चव्हाण यांना दिले.


