Monday, April 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedभाजपाच्यावतीने येसगांवातून हर घर तिरंगा अभियानास प्रारंभ!!-सौ. स्नेहलताताई कोल्हे

भाजपाच्यावतीने येसगांवातून हर घर तिरंगा अभियानास प्रारंभ!!-सौ. स्नेहलताताई कोल्हे

 कोपरगाव प्रतिनिधी

           देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भारतीय स्वातंत्र अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे आवाहन केले त्यानुसार येसगांवातील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कुल येथील विद्यार्थी विद्यार्थीनी व येसगांव ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी हर घर तिरंगा अभियानास सुरूवात केली. येसगावातुन निघालेल्या रॅलीमध्ये त्या स्वतः सहभागी होवुन देशवासियाप्रती अभिवादन केले.  प्रारंभी येसगांव सोसायटीचे अध्यक्ष सचिन दत्तात्रय कोल्हे यांनी प्रास्तविकात स्वातंत्र उत्सवाला ७५ वर्षे पुर्ण झाल्याबददल थोर पुरूषांच्या इतिहासाची माहिती दिली. न्यु इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक चंद्रकांत मोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. येसगांव न्यु इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थी विद्यार्थीनींनी पथनाटयाद्वारे याबाबत जनजागृती करून वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी, रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले त्याचे उदघाटन सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते करण्यांत आले. त्या म्हणाल्या की, ब्रिटीशांच्या तावडीतुन भारत देशाला स्वातंत्र मिळविण्यांसाठी अनेक थोर स्वातंत्रसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या घटनेला ७५ वर्षे पुर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा जागतिक स्तरावर नांवलौकीक व्हावा यासाठी हर घर तिरंगा अभियानाचे संपुर्ण भारतवासियांना आवाहन केले आहे. भारतीय जनता पक्षाच्यावतीने सर्व कार्यकत्यांमध्ये या घटनेची नवचेतना निर्माण व्हावी यासाठी १३ ते १५ ऑगस्ट पर्यंत तिरंगा ध्वजाबाबत अभियान हाती घेतले आहे त्याच्या नियोजनाच्या बैठका घेवुन थेट तळागाळात शक्ती व केंद्र प्रमुखांना यात सामिल करून घेतले आहे. 
याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, सरपंच पुंडलिक गांगुर्डे, उपसरपंच संदिप गायकवाड, गुलाबभाई तांबोळी, ग्रामसेवक दिलीप गायकवाड, केंद्र प्रमुख विद्या भोईर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अलका कदम, बचतगटाचे समन्वयक श्री. शिंदे, अनिता मुरकुटे, अमोल झावरे, बंडु आदमाने, उत्तमराव पाईक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजपा सेलचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
अमृत महोत्सवी भारतीय स्वातंत्राचा हर घर तिरंगा अभियानास येसगावातुन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते सुरूवात करण्यांत आली. रॅलीत सहभागी होत नागरिकांना अभियानाची माहिती दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!