Monday, April 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedहरिनामात दंगले ना. आशुतोष काळे,पंगतीत संताच्या पत्रावळ्या उचलून, फुगडी घालून परमानंदाची घेतली...

हरिनामात दंगले ना. आशुतोष काळे,पंगतीत संताच्या पत्रावळ्या उचलून, फुगडी घालून परमानंदाची घेतली अनुभूती!!

कोपरगाव प्रतिनिधी


तळागाळातील सामान्यातील अतिसामान्य लोकांना बरोबर घेवून ना. आशुतोष काळे कोपरगाव मतदार संघाचा सर्वांगीण विकास करीत आहे. प.पु.सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांचा १७५ वा अखंड हरीनाम सप्ताह कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र कोकमठाण येथे सुरु आहे. या सप्ताह सोहळ्यात अनेक स्वयंसेवक सेवा करीत असून सामान्य स्वयंसेवकाप्रमाणेच ना. आशुतोष काळे हे देखील तनमनधनाने या सोहळ्यात सेवा देत आहेत. पंगतीत संताच्या जेवणाच्या पत्रावळ्या उचलण्याचे पवित्र काम करून परमेश्वराच्या दारात आणि भक्तीच्या सोहळ्यात कोणीच लहान मोठा नसल्याचे ना. आशुतोष काळे यांनी दाखवून दिले आहे. 
जे का रंजले गाजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा या संत वचना प्रमाणे संपूर्ण आयुष्य ऋषीतुल्य जगणारे कर्मवीर शंकररावजी काळे यांना वारकरी सांप्रदायाविषयी मनस्वी आदर  होता. खेडले येथील ह.भ.प.तुकाराम बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळा मागील ४७ वर्षापासून श्री संत नामदेव महाराज व श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित दरवर्षी होणारा हरीनाम सप्ताह आजतागायत सुरु आहे. काळे परिवारात नेहमीच अध्यात्मिक उत्सव साजरे केले जातात. सामाजिक परमेश्वराकडे लहान मोठा,उच्च नीच असा भेद भाव नसतो त्यामुळे भेदरहित जीवन कसे जगायचे याची शिकवण वारकरी संप्रदायाकडून दिली जाते. यातून समाजातील एकोपा वाढण्यास मोठी मदत होते. कर्मवीर काळेंचा वारसा माजी आमदार अशोकराव यांच्या मार्गदर्शनाखाली ना. आशुतोष काळे समर्थपणे चालवीत असल्याचे दिसून आले.  
माणूस किती ही मोठा, किती उच्च अथवा किती श्रीमंत आहे याला महत्व नसते त्या व्यक्तीकडे संत महापुरुषांच्या विचारांचा वसा आणि वारसा किती आहे यावर त्या व्यक्तीचे खरे मोठेपण अवलंबून असते. हे गुण ना. आशुतोष काळे यांच्याकडे वंशपरंपरेप्रमाणे आल्यामुळे ते नेहमी स्वत:ला सर्व सामान्यच समजतात. त्यामुळे या सप्ताह सोहळ्यात कधी ते पंगतीत वाढतांना दिसतील, तर कधी प्रसाद तयार करण्याच्या कामात सेवा करतांना येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीस पडत आहे. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण | तरीच महिमान येईल कळो ह्या संत वचना प्रमाणे ना. आशुतोष काळे यांनी स्वतःचे अंगी परमार्थ रुजवला व वृद्धीगत केला आहे. त्यामुळे देहभान विसरून हातात टाळ घेवून अखंड सुरु असलेल्या हरिनामाच्या जयघोष करत या भक्ती सोहळ्यात स्वत:ला विसरून गेले आहेत.तसेच  संतासोबत फुगडी खेळून ना.आशुतोष काळे परमानंदाची अनुभूती देखील घेत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!