


कोपरगाव प्रतिनिधी
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दिनांक १३ते १५ ऑगस्ट दरम्यान तीन दिवस घरोघरी भारतीय तिरंगी झेंडा फडकवायचा असून त्याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमीक शाळा गिरमेवस्ती शाळेत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रभात फेरी अंतर्गत संजय नगर व गिरमे वस्ती परिसरातील घरोघरी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त प्रभात फेरी द्वारे जनजागृती करण्यात आली तसेच तिरंगी झेंड्याचे महत्त्व पटवून देऊन देशभक्ती व क्रांतीकारकांचे देशाप्रती बलिदान याची माहीती सांगून घरोघरी तिरंगा फडकविला जाईल या दृष्टीने विद्यार्थ्यांनी घोषणा देत जाणीव जागृती केली. तसेच पालक सभा घेऊन पालकांमध्ये हर घर तिरंगा विषयी माहिती देऊन झेंडा फडकवणे विषयी नियम सांगून सविस्तर माहिती देण्यात आली .
याप्रसंगी जेऊर कुंभारी गावच्या सरपंच सौ सुवर्णाताई पवार ,संजीवनी सहकारी कारखान्याचे संचालक श्री बाळासाहेब वक्ते, माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण,समाजीक कार्यकर्ते पाटीलबा वक्ते
ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड,यशवंतराव आव्हाड ,
अमित भोंगळे सौ जाधव ताई ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब सोळके तसेच शिक्षक अंगणवाडी सेविका उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अनुज ढुमणे यांनी केले. तसेच सुदाम साळुंके यांनी हर घर तिरंगा विषयी माहिती दिली व आभार श्रीमती प्रियंका जोशी यांनी मानले.



