
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव शहराच्या वैभव भर पाडणारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोरील कमानीची तात्काळ दुरुस्ती करावी अशा मागणीचे निवेदन गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांना देत केली आहे.
ढाकणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव नगरपरिषद यांच्याकडील विकास निधीतून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत कोपरगाव शहराच्या वैभवात भर पडत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसर सुशोभीकरणाचे काम गेल्या काही महिन्यापूर्वी सुरू होऊन दुरुस्तीचा पहिला हातोडा पुतळ्यासमोर असलेल्या कामानीवर पडला परंतु ती कमान अर्धवट तोडत त्याच अवस्थेत सोडून दिली आहे. त्याकडे अद्यापही प्रशासनाने लक्ष दिले नाही. परंतु आता आता सध्या पावसाचे दिवस असल्याने त्या तोडलेल्या कमानीच्या फटीमध्ये पावसाचे पाणी जाऊन ती कमान अधिक जीर्ण होत चालली आहे.
या रिमझिम पावसाच्या सरीत अनेक नागरिक त्या कमानीच्या आडोशाला आश्रय घेत असतात किंवा निराधार लोक तिथेच झोपलेले पाहवयास मिळत असतात आणि याच क्षणी जर ही अर्धवट तोडलेली कमान जर त्या निराधार व्यक्तीच्या अंगावर कोसळली तर त्यातून मोठा अनर्थ देखील होऊ शकतो त्यामुळे कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने तत्काळ या स्मारकाचे सुशोभीकरण सुरू करावे नाहीतर अर्धवट तोडलेल्या कमानीची दुरुस्ती करावी किंवा ती कायमची तोडून तरी टाकावी अशा मागणीचे निवेदन आदिनाथ ढाकणे यांनी उपमुख्याधिकारी चाकणे यांना देत केली आहे.तसेच सदर निवेदनाची प्रत ढाकणे श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांना देखील पाठवली आहे.


