
कोपरगाव प्रतिनिधी
शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे स्थापित रेन्बो इंटरनॅशनल स्कूल मध्ये वर्षभरातील सर्वच सण-उत्सव, दिनविशेष उत्साहात आणि नाविण्यपूर्णतेने साजरे केले जातात. दि .२६ जुलै हा दिवस संपूर्ण भारतभर कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो . संस्थापक अण्णा तथा लहानुभाऊ नागरे यांना सैनिकांविषयी विशेष आदर व निष्ठा होती . देशावर त्यांचे विशेष प्रेम होते . अण्णांच्या विचारधारेवर आधारीत रेन्बो इंटरनॅशनल स्कूल मध्ये कारगिल विजय दिवस देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात साजरा करण्यात आला .या प्रसंगी कारगिल युद्धात महत्वाची भूमिका बजावणारे बाबतरा गावाचे सुपुत्र निवृत्त ले . मेजर राजेंद्र धुमाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . त्यांच्या समवेत ज्येष्ठ नागरीकांनी ही हजेरी लावली . या प्रसंगी अण्णांच्या विचारामुळेच माझ्या जीवनाला दिशा मिळाल्याचे सांगत देशसेवत असतानाचे अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले . सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंजली सिंग यांनी मांडले तर दत्ता डोखे यांनी परिचय व सत्काराची सुत्रे हाताळली . मंथन घोपल व आरव पराड या विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली . राहूल कोळगे यांनी कारगिल युद्धाचा इतिवृत्तांत आपल्या भाषणातून हुबेहूब नजरे समोर ठेवला . संगीत शिक्षक श्यामसुंदर गव्हाणे सरांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी भारतमातेचे गौरव गीत सादर केले . प्राचार्य सुरेश शिंदे सरांनी आभाराची सुत्रे हाती घेत आपल्या वक्तव्यातून विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलीत केली . देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिक्रा दारुवाला सह नंदिनी वक्ते यांनी केले .विश्वभारती रूरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा .कांतीलालजी आग्रवाल, सचिव – संजयजी नागरे, विश्वस्त – मनोजशेठ आग्रवाल, आनंदजी दगडे , वनिताताई नागरे , कार्यकारी संचालक आकाश नागरे ,
उपप्राचार्य – प्रशांत भास्कर, सोमनाथ सोनवणे, प्रविण कदम यांनी कारगिल विजय दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या .


