Saturday, April 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३० कोटी देशवासीयांच्या विकासाचे स्वप्न पाहून गेल्या आठ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३० कोटी देशवासीयांच्या विकासाचे स्वप्न पाहून गेल्या आठ वर्षात त्यांनी ते प्रत्यक्ष उतरवले!!- विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३० कोटी देशवासीयांच्या विकासाचे स्वप्न पाहून गेल्या आठ वर्षात त्यांनी ते प्रत्यक्ष उतरवले.जनधन, पी एम सन्मान ,घरकुल ,अटल पेन्शन ,जल जीवन मिशन ,उज्वला गस यासह कित्येक योजना केंद्र शासनाच्या असताना हि कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मात्र विद्यमान लोकप्रतिनिधीनी स्वत:ची प्रसिद्ध करून केंद्राच्या सर्व योजनाचे श्रेय लाटले तेंव्हा सावध व्हा.. जागे व्हा…दिशाभूल करणाऱ्यांपासून दूर रहा असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले. गेल्या ७० वर्षापासून कॉंग्रेस व सहकारी पक्ष गरिबी हटावचा नारा देत होते मात्र तेच स्वत: श्रीमंत कधी झाले हे समजलेच नाही असे हि ते यावेळी म्हणाले.

          पंतप्रधान मोदी यांच्या आठ वर्षांच्या कामगिरींचा सेवा,सुशासन, गरीब कल्याण हा विकास चित्र रथ पुणतांबा चौफुली ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोपरगाव येथे सोमवारी बाईक रलीने आणण्यात आला त्या प्रसंगी कोल्हे बोलत होते. विवेक कोल्हे यांनी स्वतः बुलेट चालवत या चित्र रथाचे सारथ्य केले.

          प्रारंभी भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम ,शहराध्यक्ष दत्ता काले यांनी स्वागत केले. भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी बाईक रॅली विकासाची माहिती दिली. भाजप जिल्हा मोर्चाचे सरचिटणीस योगीराज परदेशी यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानी भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे होत्या.

          श्री विवेक कोल्हे पुढे म्हणाले कि, भारतीय जनता पक्ष हा निस्पृह असून स्वप्न व वचनपूर्ती करणारा,कुणाची दिशाभूल व फसवणारा पक्ष नाही. त्यामुळे या पक्षावर जीव ओवाळून टाकावा असे वाटते. ४१ कोटी गरीब लोक जनधन योजनेशी जोडले गेले. विरोधक शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात दिशाभूल करतात मात्र पंतप्रधान मोदी येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये प्रमाणे सुमारे ९५ हजार कोटी रुपयांचा निधी जमा करत आहे.कोरोना सारख्या अवघड परिस्थितीमध्ये प्रत्येक मोफत लसीकरण करून भूकबळी होऊ नये यासाठी ८० कोटी जनतेला मोफत धान्य पुरवले. देशाचे नाव जगात रोषण केले. सर्व योजणा केंद्र शासनाच्या असतानाही व येथील विरोधक केंद्राच्या नावाने बोटे मोडतात हे चुकीचे आहे.गेल्या अडीच वर्षापासून कुठलाही निधी न आणता केवळ भूलथापा देण्याचे काम सुरु असून केंद्राच्या योजनां व माजी आमदार कोल्हे यांनी मंजूर करून आणलेल्या कामांचे उद्घाटन करण्याचा सपाटा विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी लावला आहे.युवक, बूथ व शक्ती केंद्र प्रमुखांनी केंद्राच्या सर्व योजना सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी जाणीवपूर्वक काम करावे.येणाऱ्या सर्व निवडणुकात भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वासहि यांनी व्यक्त केला.अध्यक्षपदावरून बोलताना प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे म्हणाल्या कि, जगात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा असून तो एक परिवार आहे. त्याचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. सबका साथ ,सबका विकास यातून त्यांनी आठ वर्षात नेत्रदीपक कामगिरी करून दाखवली आहे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आपल्याला शेतकरी व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जी शिदोरी घालून दिली त्यावरच आपण काम करत आहोत. आत एक आणि बाहेर वेगळे असे प्रदर्शन आम्ही कधी करत नाही. कोपरगाव शहराला निळवंडे शिर्डी योजनेचे पाणी येणार होते . मात्र येथील लोकप्रतिनिधी यांनी ते थांबवले आता दारणा धरणातून शेजारच्या ४० गावांना पाणी देवून गोदावरी कालव्यावरील शेती सिंचन धोक्यात आणून शेतकऱ्यांचे एक पाणी आवर्तन येथील लोकप्रतिनिधी घालवत आहेत.मात्र त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू अशी ग्वाही देत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य तत्कालीन मंत्र्यांनी कोपरगाव शहर व मतदार संघाच्या विकासासाठी दिलेल्या योजनाचा पाढा सौ कोल्हे यांनी यावेळी वाचला.या प्रसंगी गटनेते रवींद्र पाठक, केशव भवर ,प्रदीप नवले,महावीर दगडे,कैलास खैरे,विजय वाजे,सुनील देवकर ,अनुराग येवले, राहुल सूर्यवंशी,गोपी गायकवाड यांच्यासह युवक रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. शेवटी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी आभार मानले.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!