
रस्ते लवकरात लवकर दुरूस्त करून द्यावे जेऊर कुंभारी
ग्रामस्थांनी राजेकंट्रक्शन यांना दिले निवेदन!!
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यात समुद्धी महामार्गचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाल्यापासुन कंपनीची अवजड वहानांमुळे जेऊर कुंभारी परिसरातील मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या अंतर्गत कच्चा रस्त्यांची दुरावस्था झाली असुन रस्त्यांनी गावातील नागरीक
शेतकरी वर्ग शाळकरी मुले यांच्या येणे जाण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे आता पावसाला तोंडावर आला असुन आता जर या रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर पावसामुळे रस्त्यावर चिखल होऊन मोठे खड्डे पडल्याशिवाय रहाणार नाही व त्यामुळे नागरीकांना दळण वळणास त्रास होणार आहे नागरिकांना गावाच्या बाहेर पडणे सुद्धा मुश्किल होणार आहे तर गायत्री कंपनीच्या वहानांनी खराब केलेले रस्ते दुरूस्त करून द्यावेत या मागणीचे निवेदन जेऊर कुंभारी ग्रामस्थांनी चांदेकसारे येथील राजेकंट्रक्शनचे अधिकारी दत्ता माने यांना दिले आहे.
या वेळी माजी
उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी सांगीतले की जेऊर कुंभारी गावातील रस्ते खराब झाले असुन वाहतुक करण्यातसाठी गायत्री कंपनीच्या अधीका-यांनी रस्त्यावर पोयटा टाकला आहे यामुळे दुचाकी चालकांना गाडी चालवता येत नाही तरी कंपनीने
रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावे नाहीतर तिव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा जेऊर कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.निवेदन प्रसंगी माजी
उपसरपंच जालिंदर चव्हाण, गिरीधर गुरसळ, कल्याणराव गुरसळ, बाळासाहेब देवकर, बाबुराव मेहेत्रे, संदिप राऊत, अजिंक्य गिरमे आदी उपस्थित होते.


