
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील
जेऊर कुंभारी गावातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम राज कन्स्ट्रक्शन या कंपनी करत आहे त्यांच्या अवजड वाहनामुळे पांढरे वस्ती येथील रस्त्याला
खड्डे पडले आहेत हा रस्ता पुढे
नगर मनमाड ते नाशिक औरंगाबाद रस्त्याकडे जातो
या ठिकाणी कंपनीने वाहतुक करण्यासाठी मातीचा रस्ता बनवलेला असून आता पावसाळा सुरु होत आहे त्यामुळे पावसाच्या पाण्याने त्या ठिकाणी चिखल होणार असून रस्ता वाहतुकीसाठी ठप्प राहील तसेच गावातून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी
कंपनीने त्या रस्त्यावर मुरूम टाकावा व रस्ता दुरूस्त करून द्यावा यासाठी जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीच्या वतीने राज कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधीकारी दत्ता माने यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी सरपंच सुवर्णा पवार यांनी बोलतांना असे सांगितले की हा रस्ता नागरिकांच्या येणे- जाण्याच्या दुष्टीने अतीश महत्त्वाचा आहे पावसाळ्यात या रस्त्यांने ग्रामस्थांना गावच्या बाहरे पडणे कठीण होईल तेव्हा कंपनीने कोणत्याही गोष्टीचा
विलंब न करता पांढरे वस्ती या रस्त्यावर मुरूम टाकावा तसेच शाळेतील मुलांना ये जा करण्यासाठी कंपनीच्या डंपर व इतर वाहनांचा त्रास होऊ नये यासाठी सिक्युरिटी गार्ड ची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे
यावेळी सरपंच सुवर्णा पवार, उपसरपंच ताराचंद लकारे, ग्रामपंचायत सदस्य गंगुताई जाधव,प्रदीप गायकवाड,संजय वक्ते, यशवंत आव्हाड,माजी सदस्य भाऊसाहेब वक्ते यांच्या सह सतीश पवार सुमित पगारे आदी उपस्थित होते.


