
कोपरगाव प्रतिनिधी
देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित असणाऱ्या नागरिकांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर निधी देत आहे. या निधीचा सदुपयोग करून नागरिकांनी घराचे स्वप्न साकार करा असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या कोपरगाव शहरातील पात्र ४१ लाभार्थ्यांना १८ लाखाच्या अनुदानाचे धनादेश ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात वाटप करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,१९९० पासून देशातील नागरिकांच्या घरांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक योजना सुरू आहेत. त्या माध्यमातून कोपरगाव शहरातील हक्काचा निवारा नसलेल्या पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून घरकुल अनुदान देण्यात येते. जास्तीत जास्त पात्र नागरिकांना घरकुलाचा लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.यापुढे देखील जे नागरिक हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित आहे अशा नागरिकांना लवकरात लवकर हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, नगर अभियंता सुनील ताजवे,प्रधानमंत्री आवास योजना अभियंता हर्षवर्धन सुराळकर, सहाय्यक रचनाकार दिपक बडगुजर, नितेश मिरीकर, पाणी पुरवठा अभियंता ऋतुजा पाटील, विद्युत अभियंता रोहित सोनवणे, कर अधिकारी श्वेता शिंदे, उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, लेखाअधिकारी तुषार नानकर,प्रदीप गाडगे, भालचंद्र उंबरजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, हाजी मेहमूद सय्यद, रमेश गवळी, फकीर कुरेशी,राजेंद्र आभाळे, नारायण लांडगे, नितीन गुंजाळ, शिवाजी कुऱ्हाडे आदी मान्यवरांसह प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या कोपरगाव शहरातील पात्र लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करतांना ना.आशुतोष काळे.


