
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीत प्रांगणात सरपंच सुवर्ण पवार
यांच्या हस्ते ध्वज उभारून श्रीफळ वाढवून स्वराज्यगुढीचे पुजन करून शिवस्वराज्याभिषेका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रगीतत व महाराष्ट्र गीत म्हणत शिवध्वजास मानवंदना देण्यात आली .या वेळी सरपंच सुवर्ण पवार यांनी बोलतांना असे सांगितले की महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात आनंदी दिवस म्हणजे ६ जून १६७४ यादिनी शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि राजे ‘छत्रपती’ झाले.आजपासून दरवर्षी ६ जून हा दिवस शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आल्याचे सरपंच सुवर्ण पवार यांनी सांगितले
यावेळी सरपंच सुवर्ण पवार, उपसरपंच ताराचंद लकारे, ग्रामपंचायत सदस्य यशवंत आव्हाड, प्रदिप गायकवाड,बापुराव वक्ते
सतिश पवार, संगिता वक्ते ,संतोष बोरावके,क्लार्क आनंद बारसे आदी उपस्थित होते.


