
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव शहराचा बिकट झालेला पाणी प्रश्न आणि शहरातील खराब रस्ते शहरातील व्यावसायिकांसाठी मोठी डोकेदुखी झाली होती.त्याचा छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. मात्र आता ही परिस्थिती बदलली असून शहरात झालेले स्वच्छ रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे निश्चितपणे व्यवसायवृद्धीला मोठा हातभार लागला असून यापुढील काळातही कोपरगाव च्या बाजारपेठेला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी केले आहे.
बजाज फायनान्स कंपनीच्या वतीने कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कर्ज मेळाव्याचे उदघाटन ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की,कोपरगाव शहराच्या बाजारपेठेचे गेलेले वैभव पुन्हा मिळविण्यासाठी शहरातील रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच आवश्यक त्या ठिकाणी विकास कामांना निधी उपलब्ध करून दिला आहे. भविष्यात यापेक्षाही जास्त निधी शहरासाठी आणून शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे.छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसाठी अल्पदरात पतपुरवठा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा मेळावा स्तुत्य उपक्रम आहे त्यामुळे येणाऱ्या काळात छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसायात सक्षमपणे उभे करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यामुळे छोटे व्यापारी आपल्या व्यसायात निश्चितपणे यशस्वी होतील.त्यामुळे कोपरगावची बाजार पेठ फुलण्यास मोठी मदत होणार असल्याचे ना.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कन्हैया चौधरी, मनलेश देशमुख, राजेंद्र वाकचौरे, महावीर केदार, संकेत पारखे, तुषार पारखे, दिलीप पारखे, कार्तिक गोर्डे, संकेत कानडे, दिलीप बोरसे, अभिषेक लकारे, सुनिता राजपाल, अमोल कदम, रोहन सोनवणे, रसिकलाल कोठारी, हर्षल कृष्णाणी, अजय शर्मा आदींसह कोपरगाव शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


