
कोपरगाव प्रतिनिधी
शासन दरबारी वेळोवेळी केलेल्या पाठपुरावा त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ मतदार संघाला मिळवून देण्यात यशस्वी झालो. अडीच वर्षात मतदार संघातील अनेक गावातील पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. या प्रयत्नांना जनतेच्या आशीर्वादाने यश मिळाले आहे. त्यामुळे अनेक गावांचा जटील असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागला असून महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरणार याचे मोठे समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन श्री. साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड,मढी बु., व देर्डे कोऱ्हाळे येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन नुकतेच ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यामध्ये मढी बु. १ कोटी ५९ लाख, देर्डे चांदवड येथे २४.९८ लाख व निधीतून व देर्डे कोऱ्हाळे २४.९० लाख या पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. यावेळी पुढे बोलतांना ना. आशुतोष काळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यात मोठी मदत झाली आहे. मागील अडीच वर्षात कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी १००० कोटीच्या वर निधी आणला. समृद्धी महामार्ग असेल किंवा एन.एच. १६० मुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना योग्य नुकसान भरपाई मिळवून दिली आहे त्याचबरोबर पाणी,रस्ते, वीज या मुलभूत प्रश्नांबरोबरच विकासाचे इतर प्रश्न देखील मार्गी लावले आहेत. यापुढील काळातही मतदार संघाचे उर्वरित विकास कामांचा पाठपुरावा करून हि कामे निश्चीतपणे मार्गी लागतील. जिल्हा परिषद, पंचायत समिती व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे हे शक्य झाले असून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत पुन्हा आपली सत्ता आणा असे आवाहन केले.
यावेळी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, आनंदराव चव्हाण, राहुल रोहमारे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती तालुकाध्यक्षा सौ. वैशाली आभाळे, कौसर सय्यद, प्रभाकर गुंजाळ, नंदकिशोर औताडे,केशव जावळे, माधवराव गायकवाड, पोपटराव गुंड, पंचायत समिती अभियंता उत्तम पवार,शाखा अभियंता आश्विन वाघ, चिमनराव गवळी, मढीचे सरपंच प्रविण निंबाळकर,निवृत्ती गवळी, सोपानकाका गवळी,आण्णासाहेब गवळी, नवनाथ चव्हाण, प्रकाश गवळी, भगवान कुऱ्हाडे, सुभाष गवळी, सुभाष कुऱ्हाडे, दत्तात्रय गवळी, तान्हाजी चव्हाण,बापू गवळी, योगेश चव्हाण, प्रदीप गवळी,गुलाबराव गवळी, ज्ञानेश्वर गवळी, तुकाराम चव्हाण, सतीश गवळी, नारायण गवळी, लहानू गवळी, सिताराम चव्हाण, अशोक गमे, रावजी चव्हाण, विलास दिघे, रामनाथ गवळी, अर्जुन निंबाळकर, रवींद्र आभाळे, बबनराव गवळी,अर्जुन गवळी, भाऊसाहेब कुऱ्हाडे, सूर्यभान गवळी, नामदेव गवळी, प्रिया गवळी, कविता गवळी, गणेश औताडे, गोरख गवळी, दिलीप डहाळे, सखाहरी खैरनार, रावसाहेब चव्हाण,परमेश्वर गुंजाळ, ठेकेदार रमाकांतजी फड, देर्डे चांदवड येथे बाबुराव कोल्हे, शिवाजी होन,चांगदेव होन, ज्ञानदेव होन, पोपटराव कोल्हे,प्रभाकर कोल्हे, तुकाराम होन, राजेंद्र कोल्हे,राजेंद्र शितोळे, संजय शितोळे, विठ्ठलराव होन,डॉ राजेंद्र होन, प्रितम मेहेत्रे, सागर होन, सचिन मेहेत्रे, प्रवीण टिळेकर, किसनराव होन, तुषार होन,देर्डे कोऱ्हाळे चे सरपंच योगिराज देशमुख,उपसरपंच सुनीता डूबे, काशिनाथ डूबे, कचेश्वर डुबे, डॉ. नरेंद्र देशमुख, शामराव शिलेदार,भगवान डुबे, कृष्णा शिलेदार, उमाकांत शिलेदार, विलास डुबे, सुभाष सावंत, कैलास डुबे, बाबासाहेब विघे, गौतम विघे, दत्तात्रय डुबे,संदीप कोल्हे, सतीश दिघे, राहुल डुबे, दत्तात्रय जाधव, दिनकर डुबे, रामनाथ डुबे, योगेश डुबे,कर्णासाहेब होन, सुरेश कासार, सतीश दिघे,ज्ञानदेव शिंदे, विकास दिघे, अजय डुबे, कचेश्वर सावंत, बाळासाहेब विघे, प्रकाश देशमुख,उत्तमराव माळी, सुभाष काळे, संजय काळे,काशीनाथ शिलेदार, अनिल पवार, अनिल डुबे,रविंद्र शिंदे, सुदाम घोडके, ज्ञानदेव होन,विलास महाले, चंद्रकांत शिकारे, दिपक शिलेदार, उत्तमराव कडलग, विलास बैरागी,संजय हलवर, भाऊसाहेब शिंदे, चांगदेव कोल्हे,सुखदेव डुबे, चंद्रकांत पवार, प्रकाश भवर,बाळासाहेब माळी, दिपक शिलेदार आदी मान्यवरांसह तीनही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


