
कोपरगाव प्रतिनिधी
संत महंतांची उपस्थिती, सनई चौघडांचा मंगलध्वनी, साथीला सूमधूर गाणी, फुलांच्या अक्षदा, वर-वधू कडील व-हाडांनी खचाखच भरलेला लग्न मंडप, वर वधुचे मामा, फटाक्यांची आतषबाजी, घोडयावरून मंडपाच्या दारी येणारे नवरदेव त्यांच्या मिरवणूकीत मनसोक्त नाचणारा युवावर्ग, आकर्षक फुलांची सजावट, बाल गोपालांची लग्न मंडपातील धावपळ, द्रोण कॅमे-यातुन टिपले जाणारे अनमोल क्षण, कन्यादान आणि नववधुला सोन्याचे मणि मंगळसुत्र देवुन त्यांचे आयूष्य उत्कर्षाने आणि समृध्दीने फुलावे यासाठी पालकत्व पत्करून मंगलाष्टक समयी तुळशीला पाणी घालणा-या भाजपाच्या प्रदेश सचिव तत्कालीन आमदार सौ. स्नेहलता कोल्हे आणि लग्नाची हौसमौज करण्यांत कुठेच उणिव भासू न देणारे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांची साथ त्यामुळे कोपरगावात तिस-या सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळयात १७ जोडप्यांना विवाहबध्द होतांना अनेकांच्या डोळयात आनंदाचे अश्रु तरळत होते. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रेरणेने २०१८ सालापासून हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सुरू झाला त्याचे हे तिसरे वर्ष होते. शुक्रवार २७ मे २०२२ रोजी तहसिल कार्यालयाच्या मैदानावर संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यासाठी सरालाबेटाचे महंत रामगिरी महाराज, औरंगाबादचे रविंद्रजी काळे, रामराव देशमुख, राजेंद्र देशमुख, सिध्देश्वर देवस्थान सुरेगांवचे बालब्रम्हचारी महंत गोवर्धनगिरी, कुंभारी येथील पू. प. राघवेश्वरानंदगिरी महाराज उंडे, महानुभाव आश्रम जेउरकुंभारीचे डॉ यशराज महानुभाव, पोहेगावच्या प पू. साध्वी शारदानंदगिरीजी, फादर विशाल त्रिभूवन, बाबा हरजितसिंग, रामेश्वर देवस्थान मळेगांवथडीचे महंत कैलासानंदगिरीजी महाराज, ओमशांतीच्या सरलादिदी, भंते कश्यप, ओम गुरूदेव आश्रम मायगांवदेवीचे हभप दिनानाथ महाराज शास्त्री, भंते आनंद सुमंतश्री, हभप मधुकर ठाकरे महाराज, मौलाना बशीर रहेमानिया, मौलाना असिफ, हभप बाबूराव महाराज चांदगुडे, हभप मनसुख महाराज दहे, फादर अजय भोसले, हभप कविता साबळे आदि संत महंत आर्शिवाद देण्यासाठी उपस्थित होते, तर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रम कोपरगांवबेटचे प्रमुख विश्वस्थ प. पू. रमेशगिरी महाराज, मंजुर देवस्थानचे श्री श्री श्री १००८ शिवानंदगिरी महाराज यांनी चित्रफितीच्या माध्यमांतुन या सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे कौतुक करून नव वधुवरांना आर्शिवाद दिले. प्रारंभी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयूटचे कार्यकारी विश्वस्थ अमितदादा कोल्हे, ज्येष्ठनेते दत्तात्रय कोल्हे, सौ. रेणुकाताई कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, बाळासाहेब संधान, सर्व आजी माजी संचालक, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे आदिनी उपस्थितांचे स्वागत केले.
महंत रामगिरी महाराज याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माणसाने नेहमीच परोपराची वृत्ती ठेवावी, वडीलधा-यांची सेवा करावी, स्वधर्माचे पालन करावे, परोपकार हेच पुण्य आहे, तीच भगवंताची पुजा आहे, कुणांला दुःख देवु नका, यातना होतील असे शब्द वापरू नका, भूकेलेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी द्या. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे विवेकभैय्या कोल्हे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी परोपकारातुन याठिकाणी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळयाचे यशस्वी आयोजन केले त्यांच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमाला आपल्या शुभेच्छा आहेत, याठिकाणी विवाहबध्द होत असलेल्या भावी जोडप्यांच्या जीवनात आरोग्य संपत्ती प्रतिष्ठा लाभावी आणि त्यांची पुढची पिढी संस्कारक्षम घडावी हाच मौलिक आर्शिवाद आहे.संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, जागवुया ज्योत माणूसकीची या ब्रिद वाक्यातुन आणि माजीमंत्री स्व शंकरराव कोल्हे यांच्या प्रेरणेतुन या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली त्याला मतदारसंघातील सर्व ज्ञात अज्ञात सातत्याने पाठबळ देतात म्हणूनच आम्हां कोल्हे कुटूंबियांना सामाजिक कार्यासाठी आर्शिवादरूपी साथ अविरत मिळत राहते मध्यंतरीचे दोन वर्ष कोरोना आपत्तीमुळे अत्यंत खडतर गेली त्यासाठीही जिल्हयात कोपरगांव येथे ५०० खाटांचे तातडीचे रूग्णालय सुरू करून ५० ऑक्सीजनयुक्त बेडची व्यवस्था करून हजारो रुग्णांवर विनामुल्य उपचार केले असेही ते म्हणाले.
तत्कालीन आमदार, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाल्या की, वंचित, दीन दलित, उपेक्षीत, सर्वसामान्य, आदिवासी, गरजु, अल्पसंख्यांक, मध्यमवर्गीय, गोर-गरीब, आदिच्या जीवनांत आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळयाची संस्कार प्रेरणा दिली तीच पुढे चालू ठेवली असुन सामुदायिक विवाह सोहळे ही काळाची गरज आहे, या समारंभात काही उणीव राहिली असेल तर ती उदार मनाने माफ करावी. या विवाह सोहळयासाठी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे संचालक सर्वश्री अरूणराव येवले, साहेबराव कदम, निवृत्ती बनकर, संजयराव होन, मनेष गाडे, सोपानराव पानगव्हाणे, शिवाजीराव वक्ते, विलासराव वाबळे, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर परजणे, फकिरराव बोरनारे, अशोकराव औताडे, प्रदिप नवले, मच्छिंद्र लोणारी, वेणुनाथ बोळीज, संगिता नरोडे, सोनुबाई भाकरे, बाळासाहेब नरोडे, अशोकराव भाकरे, त्रंबकराव सरोदे,पांडुरंग शिंदे, माजी खासदार भाउसाहेब वाकचौरे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, दौलतराव जाधव, बाळासाहेब शेटे, शिवाजीराव बारहाते, त्रंबकराव परजणे, महेश परजणे, माजी सभापती मच्छिंद्र टेके, सुनिल देवकर, भाजपा गटनेते रविंद्र पाठक, सेनेचे गटनेते योगेश बागुल, उद्योजक कैलास ठोळे, राज्य पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, विजय वाजे, राजेंद्र सोनवणे, विजय वहाडणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, दत्तोबा जगताप, शरद थोरात, संभाजी रक्ताटे, नारायण अग्रवाल, राजेंद्र बागुल, साहेबराव रोहोम, विक्रम पाचोरे, दत्ता काले, अविनाश पाठक, अतुल काले, विश्वासराव महाले, बाळासाहेब वक्ते, भास्करराव तिरसे, विक्रमादित्य सातभाई, दिपक चौधरी, बबलु वाणी, वैशाली आढाव, मंगलताई आढाव, शिल्पा रोहमारे, विजय आढाव, दिपक गायकवाड, वैभव आढाव, प्रसाद नाईक, विनोद राक्षे, पप्पू पडीयार, दिपक साळुंके, शिवाजी खांडेकर, अनिल आव्हाड, रविंद्र रोहमारे, जगदिश मोरे, दिनेश कांबळे, रविंद्र लचुरे, राहुल सुर्यवंशी, वासुदेव शिंदे, फिरोज पठाण, सनि वाघ, फकिर महंमद पहिलवान, रवी कथले, बालाजी गोर्डे, नितीश बोरूडे, सिध्दार्थ शेळके, गोपि गायकवाड, रूपेश सिनगर, स्वप्नील निखाडे, अरिफ कुरेशी, रोहन दरपेल, नरेंद्र लकारे, रामदास गायकवाड, रोहित कणगरे, राहुल रिळ, अर्जुन मरसाळे, अर्जुन मोरे, अल्ताफ पठाण, जुबेर खाटीक, निलेश बोराडे, समीर सुपेकर, सागर कोपरे, दत्ता कोळपकर, सागर राउत, सचिन दिनकर, शंकर बि-हाडे, प्रसाद प-हे, ज्ञानेश्वर सिनगर, संभाजीराव गावंड, विलास कुलकर्णी, अंबादास देवकर, माधवराव रांधवणे, मनोहर शिंदे, नरेंद्र डंबीर, हाशमभाई पटेल यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, संजीवनी उद्योग समुहातील सर्व संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, पदाधिकारी, महिला बचत गटाच्या सर्व भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नाशिक येथील काठीयावाड कापड दालनाचे प्रितीश ठक्कर, उद्योजक मुनिष ठोळे, तिलक अरोरा, नितीन कासलीवाल, सोनी पैठणी येवलाचे निशांत सोनी यांनी विशेष सहकार्य केले त्याबददल त्यांचा अहिंसा गुच्छ देवून सत्कार करण्यात आला. पौरोहित्य ब्राम्हणगांवचे प्रमोद जोशी व पंचवटी नाशिकचे अमोल जोशी यांनी केले.शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले. सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे सुरक्षा अधिकारी रमेश डांगे, सहायक सुरक्षा अधिकारी राजेंद्र देवकर व त्यांच्या सर्व सहका-यांनी चोख बंदोबस्त ठेवला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. साहेबराव दवंगे, डॉ अनिल शहाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे सर्व खातेप्रमुख उपखातेप्रमुख व विविध विभागातील कामगार वृदांनी विशेष परिश्रम घेतले.
विवेकभैय्या कोल्हे यांच्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमांतुन सुरू करण्यांत आलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळयात सन २०१८ मध्ये २६, सन २०१९ मध्ये ४१ तर सन २०२२ मध्ये १७ अशी ८४ जोडपी विवाहबध्द झाली. व-हाडी मंडळींना अंबा बर्फी, बुंदीसह मिष्टान्न भोजन देण्यात आले.
कोपरगाव येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक भैय्या कोल्हे व सौ रेणुका कोल्हे यांच्या हस्ते वधूवरांना कन्यादान संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आले.


