
कोपरगाव प्रतिनिधी
सह्याद्रीतील पश्चिम घाट माथ्यावरील पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी जे अरबी समुद्रात वाहून जात होते ते आता गोदावरी नदीमध्ये पूर्वेस वळवण्यात येणार आहे. राज्यातील महा विकास आघाडी सरकारने साधारण नुकताच या ठरावास मान्यता देऊन एकशे आठ कोटी रुपये वर्ग केले. सांगलीचे नलवडे हे या कामाचे कॉन्ट्रॅक्टर असणार आहेत. सुरुवातीला एक टीएमसी व काही वर्षात १६ टीएमसी पर्यंत पाणी वळण बंधारे म्हणजेच सॅडल टाईम द्वारे वळवण्यात येणार.
साधारण वीस वर्षांपूर्वी या कामास शासनाने मान्यता दिली होती. त्यावेळेस या प्रकल्पासाठी पाच कोटीची तरतूद ही करण्यात आली होती. पण अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत जलसंपदा मंत्री माननीय नामदार जयंत पाटील साहेब व माननीय ना.बाळासाहेब थोरात यांनी काम करण्यासाठी पुढाकार घेतला. या निर्णयामुळे गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढली जाईल व निश्चितच या प्रकल्पाचा मराठवाडा नाशिक व नगर जिल्हा साठी फायदा होणार. ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या समन्याय वाटप कायद्याद्वारे नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणातील जायकवाडीला पाणी सोडण्यात येत असे त्यामुळे नगर नाशिक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत होते. भविष्यात एक ते सोळा टीएमसी पाणी पावसाळ्यात वळवल्यामुळे जायकवाडी ची तहान नक्कीच भागणार. या प्रकल्पाची अधिक माहिती घेण्यासाठी नाशिक येथील कार्यकारी अभियंता सौ संगीता जगताप मॅडम व सोनवणे साहेब यांची भेट कोपरगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन राव शिंदे व निवृत्त जलसंपदा अधिकारी उत्तम रावजी निर्मळ यांनी घेतली. या प्रकल्पासाठी महा विकास आघाडीच्या सरकारने १०८ रुपये कोटीची तरतूद केलेली आहे असे सांगण्यात आले.

कोपरगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन शिंदे,कोपरगाव काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तुषार पोटे, सुनील साळुंखे ,विजयराव जाधव, ज्ञानेश्वर भगत, चंद्रकांत बागुल, चंद्रहार जी जगताप एडवोकेट शीतल देशमुख, राहुल गवळी, शब्बीर भाई शेख, राजू भाई अब्बास भाई शेख, बाबुराव पवार कैलास जी पैलवान, रौनक अजमेरे, दादा आवारे, किरण चांदगुडे , विलास गव्हाळे, आबु मनियार व इतर अनेक यांनी जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील व नामदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन व आभार मानले.



