Saturday, April 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोल्हे गटाने अगोदर कोपरगाव शहरातील नागरिकांची माफी मागावी!! -सुनील गंगुले

कोल्हे गटाने अगोदर कोपरगाव शहरातील नागरिकांची माफी मागावी!! -सुनील गंगुले

शहरातील नागरिक सगळा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही

कोपरगाव प्रतिनिधी

२०१९ पूर्वी देखील सर्व प्रकारची सत्तास्थाने ताब्यात असल्यामुळे कोल्हे गटाने २०१९ पर्यंत ५ नंबर साठवण तलाव होवू दिला नाही. ५ नंबर साठवण तलाव होवू नये यासाठी पडद्यामागून कोल्हेंनी काय प्रयत्न केले हे शहरातील जनतेला माहित आहे आणि २८ विकासकामांना कोण न्यायालयात घेवून गेले हे देखील शहरातील जनतेने पाहिले आहे. मात्र पुन्हा एकदा आपला पडद्यामागून विरोध करण्याचा डाव फसल्यामुळे कोल्हेंना झालेल्या मनस्तापापायी अब्रू नुकसानीची भाषा कोल्हे गट करीत आहे. मात्र त्यापूर्वी त्यांनी आजपर्यंत शहरविकासाला विरोध केल्याबद्दल अगोदर कोपरगाव शहरातील जनतेची माफी मागितली पाहिजे असे आवाहन कोल्हे गटाचे पराग संधान यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केले आहे.
कोल्हे गटाने आपल्या धारणगाव, ब्राम्हणगाव गावातील कार्यकर्त्याकरवी न्यायालयात ५ नंबर साठवण तलाव, प्रसिद्ध झालेली निविदा व मंजूर करण्यात आलेले वाढीव पाणी आरक्षण स्थगित करावे अशा आशयाची याचिका औरंगाबाद खंडपीठाने नुकतीच फेटाळली आहे. त्यामुळे एकप्रकारे ५ नंबर साठवण तलावालाच विरोध करण्याचा कोल्हेंचा डाव फसला आहे. ५ नंबर साठवण तलावामुळे कोपरगाव शहराची तहान कायमची भागणार आहे याची जाण असलेल्या श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ५ नंबर साठवण तलावासाठी किती संघर्ष केला आहे कोपरगाव शहरातील जनतेने पाहिले आहे. त्यांनी शहरातील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून आपले राजकीय वजन वापरत ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी रुपये निधी मिळविला आहे. त्यासाठी वाढीव पाणी देखील त्यांनी मंजूर करून घेतले आहे. त्यामुळे शहरातील जनतेने हे सर्व श्रेय ना. आशुतोष काळे यांनाच दिले आहे कारण ज्यावेळी ना. आशुतोष काळे ५ नंबर साठवण तलाव व्हावा यासाठी संघर्ष करीत होते त्यावेळी शहरातील जनता त्यांच्या सोबत होती व या संघर्षाचे शहरातील नागरिक साक्षीदार आहेत. त्यामुळे आपण कुठ तरी बाजूला पडलो आहोत हे कोल्हे गटाला स्वस्थ बसू देत नाही.त्यामुळे त्यांना पत्रकार परिषद घेवून सारवासारव करावी लागत असल्याचे सुनील गंगुले यांनी म्हटले आहे.
सर्व प्रकारची सत्ता असतांना माजी आमदार कोल्हेनी ५ नंबर साठवण तलाव होवू नये यासाठी समृद्धीच्या ठेकेदारावर राजकीय वजन वापरून दबाव कोणी आणला होता? आजपर्यंत शहरविकासाला कोणी खोडा घातला होता हे कोपरगाव शहरातील जनता जाणून आहे. २०१९ ची विधानसभा निवडणुकीनंतर आपले राजकीय वजन वापरून ना. आशुतोष काळे यांनी निवडून येताच तीनच महिन्यात ५ नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदाईचे काम सुरु केले. व प्रतिकूल परिस्थितीत अडीच वर्षात ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी रुपये निधी मिळवून वाढीव पाणी देखील मंजूर करून घेतले.यावरून ना.आशुतोष काळे यांनी आपले राजकीय वजन वापरून त्याचा उपयोग शहरविकासासाठी केला याउलट पाच वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व प्रकारची सत्ता असतांना आपले राजकीय वजन वापरून ५ नंबर साठवण तलावाला कधी पडद्यामागून तर कधी न्यायालयाच्या माध्यमातून शहरविकासाला विरोध करणाऱ्या कोल्हे गटाने शहरातील नागरिकांची माफी मागावी. अन्यथा शहरातील नागरिक सगळा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही- सुनील गंगुले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!