
धर्मनिरपेक्ष, सर्वाना सोबत घेवून चालणे ना. आशुतोष काळेंच्या लोकप्रियतेचे गुपित!!-मा. आ.भाऊसाहेब चिकटगावकर
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव विधानसभा मतदार संघाला जोडणाऱ्या राहाता तालुक्यातील ११ गावांमध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जरी मताधिक्य कमी मिळाले असले तरी कोपरगाव तालुक्यातील गावांप्रमाणे विकासाच्या बाबतीत समान न्याय देणार असा शब्द दिला होता. दिलेला शब्द पूर्ण करून विकासाच्या बाबतीत ११ गावांना मागील अडीच वर्षात प्रतिकूल परिस्थितीतकोपरगाव तालुक्यातील गावांच्या बरोबरीत न्याय दिला असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे सन २०२०-२१ अर्थसंकल्पीय योजनेअंतर्गत ४ कोटी ७० लक्ष रुपये निधीतून करण्यात आलेल्या जेऊर कुंभारी-शिंगवे-पुणतांबा-श्रीरामपूर रस्ता (रामा ३) किमी १३/०० ते १९/२०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण झालेल्या कामाचे लोकार्पण व दारणा प्रकल्प अंतर्गत २५ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या को.प. बंधारे देखभाल दुरुस्ती योजनेअंतर्गत पुणतांबा को.प. बंधारा रेलिंग दुरुस्ती व माथा कॉंक्रिटीकरण करणे कामाचे भूमिपूजन ना. आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते व वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.याप्रसंगी ते बोलत होते यावेळी सडे येथे ब्राह्मणगाव-टाकळी-कोपरगाव-सडे-शिंगवे रस्ता (प्रजिमा ९९) मध्ये किमी १३/०० ते १९/०० मध्ये (सडे ते शिंगवे) सुधारणा करण्याच्या ३ कोटीच्या कामाचे भूमिपूजन देखील ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, संपूर्ण मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने सर्व गावातील नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करणे हि माझी फक्त जबाबदरीच नाही तर माझे कर्तव्य आहे. त्यामुळे ११ गावातून जरी मला मतातून प्रेम कमी मिळाले असले तरी विकासासाठी निधी देतांना माझे प्रेम कधीही कमी होणार नाही. मागील पाच वर्षात या भागातील रस्ते विकासाचा निर्माण झालेला अनुशेष भरून काढण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. कोरोनाच्या संकटात देखील या ११ गावांच्या विकासासाठी निधी दिला त्यामुळे बहुतांश रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. वाकडी-रामपूरवाडी-पुणतांबा ३.२५ कोटी, पुणतांबा-शिंगवे ४.७० कोटी, वाकडी मधील अंतर्गत रस्त्यासाठी २५ लाख, न.पा. वाडी ५० लाख, वाकडी कब्रस्थानसाठी १० लाख, तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत वाकडी खंडोबा देवस्थान ७० लाख, वाकडी येथील लांडेवाडी रस्ता २० लाख, वाकडी-गणेशनगर रस्त्यावरील सी.डी.वर्क (पूल) ८० लाख, रामपूरवाडी रस्त्यांसाठी २० लाख, जळगाव व एलमवाडी ७० लाख, पुणतांबा ईदगाह मैदान १० लाख, रस्तापूर येथील रस्त्यांसाठी २० लाख व पुणतांबा गावांतर्गत रस्त्यांसाठी २० लाख व चांगदेव महाराज देवस्थान व परिसर सुशोभीकरणासाठी १ कोटी, पुणतांबा गोदावरी नदीवरी पूल दुरुस्तीसाठी २५ लाख, शिंगवे रस्त्यासाठी ५० लाख, चितळी २५ लाख असा जवळपास १४ कोटी रुपयांचा निधी या अकरा गावांच्या विकासकामांसाठी मिळविण्यात यश मिळाले आहे. या निधीतून अनेक कामे पूर्ण झाली असून काही काम प्रगतीपथावर तर काही कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोना संकट असतांना देखील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मतदार संघासाठी जास्तीत जास्त निधी आणला आहे. कोरोना संकटाची तीव्रता कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्था सुरळीत झाली असून यापेक्षाही जास्त निधी आणण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी पुणतांबा मुस्लीम पंच कमिटीच्या वतीने ना. आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर म्हणाले की, कोपरगाव विधानसभा मतदार संघात ना. आशुतोष काळे करीत असलेले काम कौतुकास्पद आहे. कोणत्याही नवख्या आमदाराला आजपर्यंत असे काम करता आले नाही ते काम त्यांनी करून दाखविले आहे ते देखील अडचणीच्या काळात हे विशेष आहे असा मी पहिला आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने पाहिला आहे. सर्व जाती धर्माच्या नागरिकांना समान न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आदर्शवत असून धर्मनिरपेक्षता व सर्वाना सोबत घेवून चालणे हे त्यांच्या लोकप्रियतेचे गुपित आहे. सध्या भोंग्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले असतांना त्यांनी श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्ष या नात्याने वर्षानुवर्षापासून भोंग्यावरून सुरु असलेली साईबाबांची काकड आरती आणि शेजारती भोंग्यावरून न घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शिर्डीच्या मुस्लीम बांधवांनी अजानच्यावेळी आम्ही भोंगा बंद ठेवू मात्र साईबाबांची आरती भोंग्यावरून घेण्यात यावी अशी विनंती केली. यावरून आपला सामाजिक एकोपा किती भक्कम आहे दाखवून देत हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला आ.आशुतोष काळे यांच्या कार्यकाळात घडले असल्याचे गौरवद्गार काढले.
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, माजी पं. स. सदस्य मधुकर टेके, पुणतांब्याचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे,अशोक धनवटे, सुधाकर जाधव, सुनील थोरात,अरुण बाबरे, रामकृष्ण चव्हाण, अण्णासाहेब कोते, दिलीप चौधरी, बाळासाहेब चव्हाण,शांतीलाल भाटी, सडेचे सरपंच अजित कोताडे, दत्तात्रय बारहाते, अण्णासाहेब बारहाते, शशिकांत बारहाते, संदीप बारहाते,अनिल बारहाते, रमेश वाकचौरे, सुनील बारहाते, छबुराव बारहाते, बाळासाहेब कोताडे,नारायण सहाणे, संभाजी कुसाळकर, सागर बारहाते, गणेश बारहाते, राजेंद्र धनवटे,भाऊसाहेब देठे, चांगदेव बारहाते, रामदास बारहाते, संभाजी कुसळकर, भानुदास लोहकणे, प्रतिक बारहाते, सुभाष बारहाते,शिवाजी बारहाते, रामभाऊ बारहाते, पद्माकर सुराळकर, पोपट सुराळकर, भाऊसाहेब जाधव, जयश सुराळकर, शिवाजी फाटे,विकास चौधरी, संभाजीराव फाटे, अशोकराव पठारे, सुभाष चौधरी, चंदर पगारे, पोपटराव चौधरी, ज्ञानदेव चौधरी, नारायण शेळके, आनंद चौधरी, राहुल फाटे, सागर काळे राहाता राष्ट्रवादी पदवीधर सेलचे तालुकाध्यक्ष सचिन धोर्डे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रताप धोंडे, वैजापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, डोणगावचे सरपंच रविंद्र धोंडे, पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारीअभियंता महेश गायकवाड, शाखा अभियंता रविराज पाटील पुणतांबा-डोणगाव कृती समितीचे सदस्य, दोन्ही गावचे उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन वैजापूर राष्ट्रवादीचे युवकचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी केले तर आभार रविंद्र धोर्डे यांनी मानले.


