Saturday, April 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्रामीण रस्त्यांचे काम लवकर सुरू करा!

ग्रामीण रस्त्यांचे काम लवकर सुरू करा!

कोपरगाव छावा क्रांतीवीर सेनेची निवेदनातून मागणी!!

कोपरगाव प्रतिनिधी

नागपूर व मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी रात्रंदिवस मोठी वाहने धावत आहे. मात्र, या वाहनांमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून नागरिकांना प्रवास करणे कठीण होत आहे म्हणून ग्रामीण रस्त्यांचे लवकरात लवकर काम करावे. अन्यथा समृद्धी महामार्गाचे उदघाटन करण्यास छावा क्रांतीवीर सेनेचा तीव्र विरोध असेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.याबाबत कोपरगावच्या नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना छावा क्रांतीवीर सेनेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सध्या समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी असणाऱ्या वाहनांमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण रस्त्यांचे काम लवकरात लवकर सुरू करावे. अन्यथा छावा क्रांतीवीर सेनेचा महामार्गाच्या उदघाटनाला तीव्र विरोध राहील आणि तहसील कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठल भुजाडे, देवा लोखंडे, सौरभ जेजूरकर, राजू कुर्हे , संतोष गिते, सुमीत वक्ते, किशोर पावसे आदिंनी दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!