
कोपरगाव प्रतिनिधी
आपल्या महाराष्ट्र राज्याला मोठी ऐतिहासिक व धार्मिक परंपरा आहे. राज्यात सर्व धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने नांदत असून प्रत्येक धर्माचा सण साजरा करतांना सर्व समाज बांधव सहभागी होतात हि आपल्या राज्यासाठी भूषणावह बाब आहे. दरवर्षी पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधव मनोभावे रोजे (उपवास) धरतात. यावर्षीचा उन्हाळा अत्यंत तीव्र स्वरूपाचा असून तापमानात मोठी वाढ झाली आहे.उन्हामुळे लाही लाही होत असतांना अशा परिस्थितीत देखील मुस्लीम बांधव मोठ्या श्रद्धेने करीत असलेले रोजे (उपवास) यातून पवित्र भक्तीचे दर्शन घडत असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले.
पवित्र रमजान महिन्यामध्ये मुस्लीम बांधवांचे रोजे (उपवास) सोडण्यासाठी कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी’इफ्तार पार्टी’ चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ना.आशुतोष काळे बोलत होते. यावेळी ना. आशुतोष काळेंच्या हाताने नन्हे रोजगारांनी खजूरीचा घास घेवून उपवास सोडला.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, रमजान महिन्याला मुस्लीम समाजामध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे.या महिन्यात पवित्र कुराण ग्रंथाचे पठण केल्यास पुण्य मिळते. हि परंपरा हजारो वर्षापासून सुरु असून अनादीकालापर्यंत सुरूच राहील. या पवित्र महिन्यात समाजातील गरीब मुस्लीम बांधवांना दान-धर्म करून त्यांचा देखील रमजान सण आनंदात साजरा करण्यासाठी मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात दान धर्म करतात यातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडते. हीच सामाजिक बांधिलकी आजवर काळे परिवाराने जपली आहे व मी देखील जपत आहे. त्या माध्यमातून कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी सर्व समाज घटकांना न्याय देवून सर्वच समाजाचे प्रश्न सोडविले आहेत. मतदार संघात सर्व जाती धर्माच्या नागरिकांचा एकोपा व ऐक्यातून यापुढील काळात देखील मतदार संघाची विकासकामे करणार आहे त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करून सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मौलाना हमीदभाई राही, मौलाना निसारभाई साहब, मौलाना अफजलभाई, मौलाना हाफिजभाई साहब, मौलाना आसिफभाई, मौलाना मुक्तारभाई, हाजी मेहमूद सय्यद, नवाज कुरेशी, फकीर कुरेशी, अजीज शेख, जावेद शेख, मुन्ना मन्सूरी, रियाज, डॉ. इलियास सय्यद, अस्लम पठाण, भुरा पठाण,हाफिज फारुकी, रशीद अत्तार, टिल्लू पठाण,वसीम शेख, महेमुद बागवान, युसूफ राणे,जलील अत्तार , फिरोज पठाण, मुक्तार मन्सूरी,इम्तियाज अत्तार, अस्लम शेख, जुनेद शेख,नेहाल शेख, रहेमान कुरेशी, जाफर कुरेशी ,चांदभाई पठाण, याकूब शेख, रशीद शेख,अल्ताफ अत्तार, वसीम शेख, याकूब अत्तार,समीर शेख, सोहेल कुरेशी, सोनुभ अत्तार,शफीक अत्तार, मोसीम शेख, वाजिद कुरेशी,शफीक शेख, सादिक शेख, अनिस शेख,आसिम शेख, शफीक सय्यद, राजु पठाण,समीर पठाण, सफुल्ला मनियार, नदीम मन्सुरी,फैजल मन्सूरी, आयुब कच्छी, अस्लम शेख,शकुर शेख, सुलतान अत्तार, सुलेमान कुरेशी,नदीम शेख, आजीम कुरेशी, जामिर कुरेशी,शाहरुख कुरेशी, हाजी मेहमूद कुरेशी, नदीम शेख, जाफर कुरेशी, इम्रान कुरेशी, अमजद अत्तार, तौसिफ कुरेशी, अल्ताफ अत्तार, समीर शेख, याकूब अत्तार, साजिद कुरेशी, हुफेज कुरेशी, शहिदा कुरेशी, अमजला मनियार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,शहराध्यक्ष सुनील गंगूले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, गटनेते नगरसेवक विरेन बोरावके,मंदार पहाडे, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, रमेश गवळी, दिनकर खरे, भरत मोरे, राहुल देवळालीकर, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग,वाल्मिक लहिरे, राजेंद्र खैरनार, बाळासाहेब रुईकर, आकाश डागा, मनोज नरोडे, राजेंद्र आभाळे, शैलेश साबळे, विकी जोशी, सागर लकारे, गणेश बोरुडे, संदीप सावतडकर, तुषार सरोदे आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.
कोपरगाव येथे ‘इफ्तार पार्टी’ प्रसंगी बोलतांना ना. आशुतोष काळे.
ना. आशुतोष काळेंच्या हाताने खजूरीचा घास घेवून उपवास सोडतांना नन्हे रोजगार.


