
जेऊर कुंभारी येथील आमदार आशुतोष काळे मित्रमंडळाच्या पाठपुराव्याला मोठे यश!!
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील हरिसन ब्रँच चारीची दुरूस्ती करण्यात यावी यासाठी आमदार आशुतोष काळे मित्रमंडळ यांनी पाटबंधारे उपविभागीय अभियांता राहता यांना निवेदन दिले होते.
चार पाच महिने उलटून गेले तरी कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही त्यानंतर आशुतोष काळे मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यानी आक्रमक पवित्रा घेताच पाटबंधारे विभाग खडबडुन जागे झाले आणी आज अखेर जेसीबीच्या सहाय्याने चारीतील काटेरी झुडपे व गवताचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच पाट पाण्याचे एक आर्वतन येऊन गेले ही परंतु चारीमध्ये काटेरी झुडपे तसेच गवत वाढल्याने शेतकर्यांच्या शेतात पाणी गेले नाही तोच एका दिवसात पाटबंधारे विभागाने आवर्तन बंद केले अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनाचे शेतक-यांनी तिव्र शब्द निषेध केला आक्रमक पवित्रा घेतल्याने पाटबंधारे विभागाने दखल घेत कामास सुरवात केल्याने गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दिलीपराव शिंदे समाजिक कार्यकर्ते रोहिदास होन,पाटीलबा वक्ते, राजेंद्र गिरमे,कल्याण गुरसळ, बापुराव वक्ते, महेंद्र वक्ते यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे


