Wednesday, April 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅनिटायझर परवान्याचे २०२२ पर्यंत नुतणीकरण मा. आमदार स्नेहलताताई कोल्हे यांचे प्रयत्नांना केंद्र...

सॅनिटायझर परवान्याचे २०२२ पर्यंत नुतणीकरण मा. आमदार स्नेहलताताई कोल्हे यांचे प्रयत्नांना केंद्र शासनाकडुन तात्काळ प्रतिसाद

कोपरगाव प्रतिनिधी

           कोरोना महामारीच्या उच्चाटनांसाठी दर्जेदार हँड सॅनिटायझरची निर्मिती संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी राज्यात सर्वप्रथम करून त्यात सातत्य ठेवले या उत्पादनासाठी आणखी मुदतवाढ मिळावी अशी मागणी कोपरगांव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार, भाजपाच्या प्रदेश सचिव मा. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी ई मेल द्वारे दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी भारत सरकारकडे केली होती त्यास अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय नवीदिल्लीचे सहसचिव सुबोधकुमार सिंग यांनी तात्काळ प्रतिसाद देवुन दिनांक ३० डिसेंबर २०२१ रोजी ई मेल द्वारे तात्काळ मंजुरी देवुन त्याचे ३१.१२.२०२२ पर्यंत मुदत वाढवुन दिले आहे त्याबददल त्यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर सशक्त भारत’ निर्मितीसाठी देशातील सर्व उद्योग समुहांना आवाहन केले होते त्याप्रमाणे अहमदनगर जिल्हयातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने राज्यात सर्वप्रथम संजीवनी ‘हँड सॅनिटायझरची’ निर्मिती करून आघाडी घेतली होती. या सर्व सॅनिटायझर उत्पादनाची मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतच होती, ती वाढवुन मिळावी म्हणून केंद्र शासनाकडे मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी ईमेलद्वारे निवेदन पाठविले होते त्यास भारत सरकारचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे सहसचिव सुबोधकुमार सिंग यांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत त्यास ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत वाढीव मंजुरी दिली आहे त्यामुळे केंद्र शासनाने पुन्हा एकदा आत्मनिर्भर सशक्त व स्वावलंबी भारत यासाठी सतत प्रयत्नशिल आहोत असे दाखवुन दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील व देशातील सर्वच सॅनिटायझर उत्पादकांना सरसकट मंजुरी दिली आहे. सध्या कोरोना व ओमिक्रोनचे वाढते रुग्ण विचारात घेता या समयसूचकतेचे सामाजिक भान ठेवून त्यांनी वेळीच मागणी केल्याने मा. आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 
सदर वाढीव मंजुरीमुळे महाराष्ट्रातील व देशातील सॅनिटायझर उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला असुन ही वाढीव मंजुरी प्रत्येक भारतीय नागरिकांचे जीवनाशी महत्वाची असल्याचे मत भाजपाचे युवा नेते व तज्ञ संचालक मा. विवेकभैच्या कोल्हे यांनी व्यक्त केले, तसेच येणारे नविन वर्ष २०२२ कोरोनामुक्त भारत होवो अशी सदिच्छा मा.आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त करून २०२२ नव वर्ष सर्वांना सुखी समृध्दीचे व आनंदाचे ठरो अशा सदिच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!