
कोपरगाव प्रतिनिधी
भास्करराव तुवर यांची शरद जोशी प्रेणीत रघुनाथ दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या संघटक पदी बिनविरोध निवड झाली त्यांच्या निवडीबद्दल
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावातील आमदार आशुतोष काळे मित्र मंडळ यांच्या वतीने आज दि ३० डिसेंबर रोजी पाटीलबा वक्ते यांच्या वस्तीवर भास्करराव तुवर यांना सामाजिक कार्यकर्ते पाटीलबा वक्ते, कल्याण गुरसळ, बापुराव वक्ते, महेंद्र वक्ते, किरण वक्ते यांनी श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते पाटीलबा वक्ते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की भास्करराव तुवर हे प्रमुख्याने शेतकरी आहे त्यांना शेतकऱ्यांविषयी आस्था आहे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलन ही केली आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात शेतकर्यांच्या पिकांना योग्य भाव मिळण्यासाठी भास्करराव तुवर नेहमी प्रयत्न करतील अशी आशा सामाजिक
कार्यकर्ते पाटीलबा वक्ते यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना भास्करराव तुवर यांनी सांगितले की या संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नानाला वेळोवेळी वाच्या फोटली जाईल.
यावेळी सत्कार प्रसंगी पाटीलबा वक्ते, कल्याणराव गुरसळ,बापुराव वक्ते, महेंद्र वक्ते, किरण वक्ते, नामदेव वक्ते, आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


