
कोपरगाव प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांच्या दरबारात योगेश बागुल यांच्या कार्याची दखल
गेल्या 10 वर्षांपासून शहरासह, प्रभागातील प्रलंबित प्रश्न, युवकांच्या समस्या, कोरोना कालावधीत सर्व सामान्य नागरिकांना विशेष मदती बरोबर इतर कामकाजाचे दखल घेवुन शिवसेना पक्ष प्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेबांनी शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक योगेश बागुल यांचा विशेष सन्मान करुन केलेल्या कामकाजाची दखल घेतली.कोपरगांव शहरासह प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावतांना कोणताही स्वार्थ किंवा राजकारण डोळयासमोर ठेवले नाही. प्रलंबित प्रश्न कशापध्दतीने सोडविता येईल याकडे पहिल्यापासून लक्ष केंद्रीत केल्यामुळे अनेक प्रश्न सोडविण्यात मला यश मिळाले परंतु माझ्या कार्यकाळात कामकाज करतांना विरोधकांनी अनेक अडचणी उभ्या केले असले तरी हयाच अडचणीमुळे मला विशेष प्रेरणा दिली असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे गटनेते, माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक योगेश बागुल यांनी दिली. नगरसेवक पदाचा कार्यकाळ पूर्ण होताच कोपरगांवकरांसह, विरोधकांचे योगेश बागुल यांनी जाहिर आभार मानले.
नागरिकांचे प्र्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांनी प्रतिनिधी म्हणुन मला सर्वाधिक मतांनी दोन वेळेस निवडुन दिले. माझ्या 10 वर्षाच्या कार्यकाळात नागरिकांच्या विश्वासाला कधीही तडा जावु दिला नाही आणि शेवटपर्यंत विश्वास असाच राहणार आहे. स्वच्छ संुदर शहर हीच संकल्पना डोळयासमोर ठेवुनच काम केले. प्रभागात अशक्य असणारे अनेक कामे शक्य करुन दाखविले यासाठी प्रभागातील नागरिकांनी मोठी साथ दिली. संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे, अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे, शिवसेनेचे नेते राजेंद्र झावरे, रावसाहेब खेवरे, संजय सातभाई, कैलास जाधव, शिवाजी ठाकरे भाजप शिवसेनेचे नेते मंडळी यांनी विकास कामे करतांना, प्रश्न मार्गी लावतांना विशेष मार्गदर्शन केले.
कोरोना काळात सर्व नागरिकांना मदत, सर्व प्रभागात अग्रक्रमाने लसीकरण, किरणा वाटप, कोरोना ने मृत्यु झालेल्या गरिब कुटुंबियांना शासकीय आर्थिक मदत, विधवा महिलांना अनुदान, नरेंद्र मोदी घरकुल योजनेतुन उच्चांकी मदत, गरजुंना दोन वेळेचे जेवणाची सुविधा, सर्व सामान्य व्यक्तीपासुन गोरगरिबांना आधार व विशेष मदत, सर्व धार्मीक सामाजिक, वैयक्तिक कामांना आर्थिक मदत, आयुष्यमान भारत योजनेतून 10 नागरिकांची बायपास तर 13 इंजिओप्लास्टिी इतर सुविधा उपलब्ध करुन दिले. प्रभागातील विविध विकासकामे कार्यकाळात ठरविल्यामुळे सर्व उद्दिष्ट पूर्ण झाले. बाजारतळ, मेनरोड, विस्थापितांच्या गाळयांची मंजुरीसाठी विशेष प्रयत्न व पाठपुरावा, गोदावरी निधी संवर्धन अंतर्गत घर बांधकाम, सर्व नागरिकांना स्वखर्चाने व शासकीय सहकार्याने आरोग्य व अपघाती विमा आदि प्रकारचे उपक्रम व सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नविन उद्दिष्ट डोळयासमोर ठेवले तेही पूर्ण करुन दाखविणार असल्याचे योगेश बागुल म्हणाले.
बागुल बोलतांना म्हणाले की, प्रभागातील प्रश्न मार्गी लावतांना ज्ञानेश्वर गोसावी, राहुल आढाव, संजय मंडलीक, पप्पू पडियार, अतुल काले, रंजन जाधव, गौरिश लव्हरीकर, अशिष निकुंभ, कुणाल लोणारी, निखिल जोशी, राहुल खडांगळे, मयुर खडांगळे, आदित्य लोणारी, भूषण मुळीक, हेमंत गोसावी, शुभम बंटी गोसावी, भावसार इतर शिवसैनिक व कार्यकर्ते यांच्यासह नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, पराग संधान, तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, वासुदेव देसले, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, प्रशांत सरोदे, नगरपरिषद मधील सर्व विभागातील कर्मचारी, अधिकारी यांच्यासह शहरातील ज्येष्ठ नागरिक, सर्व समाज बांधव, सामाजिक क्षेत्रात काम करणाारे तरुण मंडळ, युवा मंच, प्रतिष्ठाण, व्यापारी मित्र मंडळ, सराफ सुवर्णकार असोसिएशन, यांच्यासह भाजप शिवसेना मित्र पक्षाचे मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व शिवसैनिकांनी संपूर्ण कार्यकाळात विशेष सहकार्य केल्या बद्दल योगेश बागुल यांनी मानले आभार.


