
कोपरगाव प्रतिनिधी
राजकारण निवडणुकीपूरतेच करायचे ही काळे परीवाराची परंपरा आहे.त्यामुळे २०१६ च्या निवडणुकीत जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात नगरसेवक निवडून आले तेव्हा देखील विकासाच्या बाजूने उभा होतो आणि विधानसभा निवडणुकीत नगराध्यक्ष विजय वहाडणे जरी प्रतिस्पर्धी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते त्याचा राग धरून कधीच विकासाला विरोध केला नाही उलट निवडून येताच दोनच महिन्यात ५ नंबर साठवण तलावाच्या कामाचा दिलेला शब्द पूर्ण करून प्राथमिक खोदाइचे काम सुरू केले. हे शहरातील जनतेने पाहिले आहे. विकास हा एकच माझा अजेंडा असून शहरातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी कोपरगाव नगररिषदेची सत्ता द्या असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत १ कोटी रुपये निधीतून कोपरगाव शहरातील बाजारतळ येथील स्मशानभूमीच्या नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विजय वहाडणे होते.
यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे, वर्षा कहार, सौ. माधवी वाकचौरे, सौ. वर्षा शिंगाडे, अजीज शेख,राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, कृष्णा आढाव,सौ. रेखा जगताप, रमेश गवळी, फकीर कुरेशी उपस्थित होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की,कोपरगाव नगरपरिषदेत बहुमत असतांना त्या बहुमताचा उपयोग विकासासाठी होणे अपेक्षित असतांना ते बहुमत शहरवासीयांना विकासापासून वंचित ठेवण्यासाठी वापरले गेले.याला शहरातील जनता कधीही माफ करणार नाही.जनतेचा रोष वाढल्यावर सत्ताधाऱ्यांनी विकासकामांना जरी सहमती दाखवीली मात्र त्यावेळी वेळ निघून गेली होती व विकास कामांसाठी निधी असतांना देखील नागरिकांना हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या होत्या.यापुढे ही परिस्थिती बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून द्या विकासाच्या बाबतीत शहराचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली. यावेळी ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १२० कोटी रुपयांची तांत्रिक मंजुरी आणल्याबद्दल प्रभागातील महिलांनी आ.आशुतोष काळे यांचे औक्षण करून सत्कार केला.याप्रसंगी सचिन परदेशी,चंद्रशेखर म्हस्के, अशोक आव्हाटे,बाळासाहेब रुईकर, संदीप कपिले,वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, आकाश डागा, राहुल देवळालीकर, संदीप देवळालीकर, राजेंद्र खैरनार, इम्तियाज अत्तार, गणेश लकारे, नारायण लांडगे,विकि जोशी, शुभम भुजबळ, सतिश शिंदे,मनोज नरोडे, गोरख कानडे, योगेश निकम,पांडुरंग नरोडे, संतोष शेजवळ, प्रताप गोसावी, भाग्यश्री बोरुडे, दिक्षा उनवणे,भारती रुईकर, पुजा देवळालीकर, रुपाली कळसकर, शितल वायखिंडे, संगिता आहेर, मीना दीक्षित, मुन्ना पठाण, एकनाथ गंगूले, बापू वढणे, सागर लकारे, कुलदीप लवांडे, अय्युब कुरेशी, अय्युब कच्छी,शिवाजी लकारे, चांदभाई पठाण, अमोल देवकर, गणेश बोरुडे, राहुल आदमाने,दादासाहेब हलवाई, बाळासाहेब लहारे,फिरोज पठाण, तुकाराम नरोडे,भाऊसाहेब बागुल, प्रकाश भडकवाडे,प्रसाद रुईकर, रोशन शेजवळ, रिंकेश खडांगळे, राजेंद्र उशिरे, प्रदीप मते,शिवाजीराव कुऱ्हाडे, दिनेश संत, अमोल आढाव, तेजस साबळे, नगरपरिषद अभियंता धीरज गुरसळ, दादासाहेब शिंदे,रवींद्र गायकवाड, युसूफ शेख, साजिद शेख, नामदेव मोरे, संजय ठाकूर, संतोष शेलार, संकेत मलिक, पियुष विसपुते,गिरीष सोनकर, संतोष देवळालीकर, महेश उदावंत, जनार्दन शिंदे, रोहित लकारे,समर्थ दिक्षित, स्वप्नील सोनवणे, रोहित खडांगळे, प्रसाद लचुरे, गौरव सोनवणे,विश्वनाथ उदावंत, अमित आमले, रमेश उगले, सोमेश शिंदे, अमोल देवकर, तुषार कहार, राहुल कहार, तेजस देवळालीकर,गौरवज जंगम, अझर शेख, तुषार चिकटे,अमीर पठाण, जुनेद अत्तार, ओम दुसाने,सलिम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.ज्यांना कोपरगाव शहरातील जनतेने मोठ्या विश्वासाने कोपरगाव नगरपरिषदेत बहुमत देवून सत्तेवर बसविले. त्यावेळी सर्व मिळून सर्व मुलभूत प्रश्न मार्गी लावून कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे ठरविले होते. मात्र प्रत्येक विकासकामात सोयीस्करपणे अडथळे निर्माण करण्यात आले. विकासात अडथळे निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तींना व विकासाला आडवे येणाऱ्यांना नागरिकांनी येत्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत धडा शिकवावा – नगराध्यक्ष विजय वहाडणे.कोपरगाव शहरातील बाजारतळ येथील स्मशानभूमीच्या नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आ.आशुतोष काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे व मान्यवर.


