
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यासाठी ३५ वर्ष लढा उभारणारे काशी(बनारस)हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक,भारतरत्न पंडित मदन मोहन मालवीय व भारताचे माजी प्रधानमंत्री,कवी मनाचे हळवे व्यक्तीमत्व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे जयंती निमित्त सिध्दकलानगर येथील उद्यानात फळझाडाचे वृक्षारोपण पालकत्व अभियान राबविण्यात आले आहे. कोपरगावचे जेष्ठ नागरिक व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा दिर्घ सहवास लाभलेले स्नेही टेकचंद खुबाणी व सुधाप्पा कुलकर्णी यांचे शुभहस्ते सिध्दकला नगर येथील उद्यानात फळझाडाचे वृक्षारोपण करून पालकत्व देण्यात आले.या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दुर्गावाहिनी सदस्या व योग शिक्षिका सौ.वृंदाताई कोर्हाळकर, प्रगतशील शेतकरी दिलीप गिरमे,अंजनी डेव्हलपर्सचे संचालक व साहित्यिक राजेंद्र कोयटे,राष्ट्रीय हरित सेनेचे मेजर अतुल कोताडे, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, सोपानराव भालेराव, सदाभाऊ साटोटे आदिंसह वृक्षप्रेमी उपस्थित होते.सिध्दकला नगर हे अंजनी डेव्हलपर्सचे संचालक राजेंद्र कोयटे,दिलीप गिरमे यांनी विकसित केले आहे.येथील पथ दिव्याचे तिरंगी रंगतीचे खांब राष्ट्रभावनेतून लोकांचे लक्ष वेधून घेतात.तसेच परिसरात रंगीबेरंगी ध्वज लावण्यात आले आहे.सूर्यतेज संस्थेच्या वतीने स्वच्छता-जलशक्ती-वृक्षारोपण पर्यावरण अभियान निरंतर सुरू आहे.सिद्धकला नगर येथे उद्यानात विविध फळझाडांचे रोपण करण्यात आले आहे.यात आंबा,सिताफळ,रामफळ,जांभूळ,अंजीर,बदाम,आवळा,पेरु,चिकू यासह विविध फळझाडे लावण्यात आली आहे.या झाडांचे पालकत्व देण्यात आले आहे.कोपरगांव शहरात फळ झाडांचे उद्यानाला उपस्थितांनी व वृक्षप्रेमींनी शुभेच्छा दिल्या आहेत.


