
कोपरगाव प्रतिनिधी
कोरोना ने जगावर थैमान घातले आहे त्यादृष्टीने प्रशासन आपल्या स्तरावर प्रयत्न करत आहे प्रशासनाला सहाय्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे गेल्या दोन वर्षापासून कोरोनाने नागरिकांचे जीवनमान खालावलेले असुन देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे हि गोष्ट नागरिकांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे अजून कोरोना
संपला नाही हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे असे प्रतिपादन कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक संजयराव होन यांनी केले आहे.
अजून कोरोना ही महामारी
संपला नाही ती रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी दुसरा डोस घेतला पाहिजे तहसीलदार विजय बोरुडे यांनी दिलेल्या आव्हानाला चांदेकसारे गावाने चांगला प्रतिसाद दिला आहे हर घर दस्तक या योजनेअंतर्गत चांदेकसारे गावात आरोग्य केंद्राच्या अंतर्गत तसेच ग्रामपंचायतीच्या मदतीने चांदेकसारे गावात ९५% लसीकरण झाले आहे उर्वरित पाच टक्के नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे आपले व कुटुंबाची काळजी घेतली पाहीजे असे आवाहन संजयराव होन यांनी केले.


