
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य साता समुद्रापार गेले असुन मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने देशात आणि विदेशात महिमा आण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या लिखानाच्या माध्यमातून पसरविला आहे. अशा या महान साहित्य रत्नाचे स्मारक तयार असुन मात्र त्यांचा पुतळा अद्याप बसविला नाही. एक महिन्याच्या आत जर नगरपालिकेने पुतळा बसविला नाही तर कोपरगाव काँग्रेस तालुका व शहर कमिटीच्या वतीने येणाऱ्या कोपरगाव नगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार घालू व एक महिन्यानंतर उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आला आहे.
कोपरगाव शहरामध्ये आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची जागा निश्चित असुन स्मारकाचे कामही पूर्ण झाले आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळाही पूर्ण झाला आहे मात्र काही लोकांच्या अनास्थेमुळे पुतळा बसविला नाही. शहरामध्ये आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक असावे अशी सर्व जनतेची इच्छा आहे त्यामुळे एक महिन्याच्या आत पुतळा बसवावा असे निवेदन देण्यात आले आहे. सदर प्रसंगी कोपरगाव काँग्रेसचे युवा नेते आकाश नागरे, जिल्हा अध्यक्ष सविता विधाते, शहराध्यक्ष रविंद्र साबळे ,शहर कार्याध्यक्ष युसुफ भाई शेख, तालुका कार्याध्यक्ष मंगल आव्हाड यांच्यासह यादवराव त्रिभुवन आदी उपस्थित होते.


