
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यात जेऊर कुंभारी येथील आमदार आशुतोष दादा काळे मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यानी श्री संत जर्नादन स्वामी महाराज समाधी ट्रस्टच्या विश्वस्तपदी परमपुज्य रमेशगिरीजी महाराज यांची निवड झाल्याबद्दल पाटीलबा वक्ते, दिलीप शिंदे, कल्याणराव गुरसळ ,बापुराव वक्ते, महेंद्र वक्ते, किरण वक्ते,किशोर वक्ते, विशाल गुरसळ, नामदेव वक्ते, विश्वजीत वक्ते, सुभाष जावळे,
यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
आश्रमाचे अध्यक्ष मोहनराव चव्हाण यांच्या दुःखत निधनानंतर रिक्त झालेल्या जागी औरंगाबादचे होळकर यांची अध्यक्ष पदी निवड झाली तर विश्वस्तपदी परमपुज्य रमेशगिरीजी महाराज यांची निवड झाली आहे .
याप्रसंगी पाटीलबाव वक्ते बोलतांना म्हणाले की
महाराष्ट्रात संत जर्नादन स्वामी आश्रम हे भक्त गणांचे श्रद्धा स्थान म्हणून ओळखले जाते.येथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.जनार्दन स्वामी आश्रमात नेहमी काकडा आरती व भजन होत असते.
परम पूज्य रमेशगिरी महाराज यांना माननारा मोठा भक्त परिवार आहे.मठाधिपती परमपुज्य रमेशगीरी ची महाराज यांच्या निवड ही सर्व भक्तांची इच्छा होती.असे प्रतिपादन पाटीलबा वक्ते यांनी केले.


