Wednesday, April 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज!! –...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज!! – आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी
         

विविध जाती धर्माच्या नागरिकांचे वास्तव्य असलेल्या भारत देशात प्रत्येक नागरिकाला आपले विचार मांडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अजोड बुद्धीतून देशाची आदर्श घटना लिहिली. देशात शांती नांदावी व देशाची सर्वांगीण प्रगती व्हावी हे बाबासाहेबांचे स्वप्न होते. परंतु आजही आपण प्रगतीच्या बाबतीत मागे आहोत. देशाच्या बाबतीत प्रगतीसाठी व त्यांच्या स्वप्नातला भारत देश घडविणे हि प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी प्रत्येक भारतीयाचे योगदान महत्वाचे असून बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते.मागील वर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठीमहापरिनिर्वाणदिनी तमाम अनुयायांनी व भीमसैनिकांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपापल्या घरातून अभिवादन केले होते. मात्र काही महिन्यांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे सर्व कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा नवा व्हेरीयंट असलेल्या ओमायक्रॉनचे राज्यात काही रुग्ण सापडल्यामुळे योग्य ती काळजी घेवून असंख्य भीमसैनिक व राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले.याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, हाजीमेहमूद सय्यद,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, रमेश गवळी, दिनकर खरे, फकीर कुरेशी, प्रकाश दुशिंग, रावसाहेब साठे, राजेंद्र खैरनार, वाल्मिक लहिरे, आकाश डागा, संतोष बारसे, मनोज नरोडे, नितीन शिंदे,बाळासाहेब पवार, किरण बागुल, शंकर घोडेराव, विजय त्रिभुवन, राजु विघे, राहुल खंडिझोड, मनोज शिंदे, संजय दुशिंग, रोशनशेजवळ, लक्ष्मण सताळे, सौ. मायादेवी खरे, मीराताई साळवे,कु. दिप्ती रणशूर आदींसहभीमसैनिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!