Wednesday, April 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedदोन वर्षात विकासासाठी भरघोस निधी दिला,येणाऱ्या निवडणुकीत पाठबळ द्या !! -आ. आशुतोष...

दोन वर्षात विकासासाठी भरघोस निधी दिला,येणाऱ्या निवडणुकीत पाठबळ द्या !! -आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी

दोन वर्षात प्रतिकूल परिस्थितीत मतदार संघाच्या विकासासाठी भरघोस निधी आणून सर्वच गावांना समप्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळे प्रत्येक गावात विकासकामे जोरात सुरु आहेत. अनेक विकास कामांना निधी मंजूर करून आणला आहे. टप्याटप्याने त्यांची देखील उद्घाटने होणार असून मतदार संघात विकासाची कामे शिल्लक राहणार नाही याची काळजी मी घेत आहे. तुम्ही देखील आजवर मला दिलेलं पाठबळ येणाऱ्या सर्वच निवडणुकात द्या असे आवाहन श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी टाकळी येथे केले.
कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे पवार गिरणी संवत्सर, भोजडे, धोत्रे जिल्हा हद्द रस्ता (प्रजिमा ५) या रस्त्याच्या २.५० कोटीच्या मजबुतीकरणडांबरीकरण कामाचे भूमिपूजन श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा विरोधी पक्षातील भाजपा कार्यकर्त्यांचा ओढा वाढला असून या कार्यक्रमात देखील भाजपाकोल्हे गटाचे आण्णासाहेब देवकर, राजेंद्र गायकवाड, श्रावण शिलावंत आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, विकासाच्या बाबतीत मागील पाच वर्षात तुमचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत विकासाच्या अपेक्षेने दिलेल्या मताधिक्यातून विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. परंतु विकास कामांसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीतून देखील निधी आणून विकास साधला जावू शकतो हे आपण मागील पाच वर्षात अनुभवले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील सत्ता असणे आवश्यक आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासकामांना निधी कमी पडू दिला नाही व यापुढेदेखील कमी पडू देणार नाही. त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील पाठबळ द्या तुमच्या विकासाच्या शिल्लक असलेल्या अपेक्षा देखील पूर्ण होतील असा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिला. 
याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनराव काळे, सदस्य अनिल कदम, श्रावण आसने, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, विठ्ठलराव आसने, अशोकमामा काळे, कारभारी आगवण, भास्करराव मांजरे, भागवतराव देवकर, भाऊसाहेब देवकर, छगणराव देवकर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, नानासाहेब चौधरी, सुभाष दवंगे, अशोकराव देवकर, सांडूभाई पठाण,नारायणराव बर्डे, लालूमामा शेख,नामदेव देवकर, शशिकांत देवकर,ज्ञानेश्वर देवकर, अमोल परदेशी, प्रताप देवकर, गोरख देवकर, बाळासाहेब पाईक, श्रावण शिलावंत, सोमनाथ देवकर, बाळासाहेब देवकर, गणेश पळसकर, नानासाहेब दवंगे, रामदास रणशूर, रावसाहेब चौधरी, निखील जाधव, सचिन चौधरी, राजेंद्र जाधव,आण्णासाहेब जाधव, शिवाजी कदम,वाल्मीक शिंदे, इक्बाल तांबोळी, सनी आव्हाड, संजय परदेशी, राजेंद्र गायकवाड, वैभव घोंगटे, बाबासाहेब आसने, भाऊसाहेब सांगळे, मंगलताई परदेशी, गणेश देवकर, संभाजीराव देवकर आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट :- आज पर्यंत आम्ही ज्यांच्या मागे उभे होतो, ज्यांना आम्ही वेळोवेळी संधी दिली ते फक्त निवडणुकीवेळी मतदान मागण्यासाठी येत होते परत पाच वर्ष कधी भेट नाही. त्याचे रस्ते कधीच एक किलोमीटरच्या पुढे गेले नाही. मात्र मागील दोन वर्षापासून विकास काय असतो हे आ.आशुतोष काळे यांच्या माध्यमातून दिसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही आ. आशुतोष काळे यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकत्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!