
कोपरगाव प्रतिनिधी
भारत सर्व सेवासंघ पाचेगांव शैक्षणिक संस्थेच्या गैरकारभाराबाबत शालेय शिक्षण मंत्री महोदयाकडे मोठया प्रमाणांत तकारी दाखल झाल्या असुन त्याची चौकशी शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु यांनी सुरू केली असुन ३० नोव्हेंबर रोजी त्याची प्राथमिक सुनावणी शालेय शिक्षण राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत व शिक्षण उपसंचालक पुणे, जिल्हा शिक्षणाधिकारी आणि धर्मादाय उपायुक्त यांच्या प्रतिनिर्धी समक्ष झाली असुन असे असतांनाही भारत सर्व सेवा संघ पाचेगांव या शैक्षणिक संस्थेचे स्वयंघोषीत विश्वस्थ बेकायदा अनुकंपाखाली भरती करत असुन त्यास सर्वस्वी तेच जबाबदार असतील अशा आशयाचे निवेदन श्री. सुनिल सुतावंणे यांनी अहमदनगरचे माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगरचे शिक्षणाधिकारी यांना शुक्रवार ३ डिसेंबर रोजी लेखी दिले आहे.
श्री. सुनिल सुतावंणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, भारत सर्व सेवा संघ पाचेगांव या संस्थेतील तथाकथीत स्वयंघोषीत विश्वस्थांनी केलेल्या गैर कारभाराची व शासनाच्या केलेल्या फसवणुकीच्या असंख्य तकारी वरून ३० नोव्हेंबर २०२१ रोजी शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक यांना सदर चौकशी करून १५ दिवसांचे आत अहवाल सादर करण्यांबाबत कळविले आहे., असे असतांनाही स्वयंघोषीत विश्वस्थ हे बेकायदेशीर अनुकंपाखाली शिक्षक भरती करण्यांच्या तयारीत आहेत त्याप्रमाणे त्यांनी संबंधीत शिक्षकाकडुन याबाबत हालचाली सुरू केलेल्या आहेत. या संस्थेची चौकशी सुरू केली आहे, तरी याप्रकरणी स्वयंघोषीत विश्वस्थ बेकायदा शिक्षक भरती करण्यांच्या विचारात आहे यात या शिक्षकांचा बळी जाईल तरी सर्वांनी सतर्क व्हावे यादृष्टीने शिक्षणाधिकारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांना लेखी निवेदन दिले आहे असेही शेवटी सुनिल सुतावणे यांनी सांगितले.


