Tuesday, March 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंविधानाने दिलेल्या हक्क अधिकाराची तरुणांमध्ये जनजागृती होणे गरजेचे !!रवींद्र जगताप

संविधानाने दिलेल्या हक्क अधिकाराची तरुणांमध्ये जनजागृती होणे गरजेचे !!रवींद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी

देशभक्ती सेवा मंचच्या वतिने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.या संविधाना निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेले हक्क अधिकार आणि राजकारण त्याच बरोबर भारतीय व्यवस्था आणि तरूणांनी वाढती गुन्हेगारी या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले तसेच कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यध्यक्ष संदीपजी वर्पे कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे हे उपस्थित होते देशभक्ती सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र नानासाहेब जगताप म्हणाले की,भारतीय संविधानाने दिलेल्या हक्क अधिकाराची जनजागृती तरुणामध्ये होणे गरजेचे आहे.शिक्षणाचे खाजगीकरण सेझ आधीच्या माध्यमातून नुकसान होत आहे.त्यासाठी तरूणांनी संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या हक्क अधिकाराची जनजागृती करणे गरजेचे आहे. यानंतर इंजिनियर दिवेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले संविधान नेमके काय संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार याबाबत माहीती दिली तसेच पो.नि.देसले यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की भारतीय राज्यघटनेचे घटनाकार डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळे जगाला प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली राजेशाही संपुष्टात येऊन सर्वसामान्य मतदारांच्या हातात देशाची सुत्रे आली त्यामुळे मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला असे पो.नि.देसले यांनी म्हटले आहे यानंतर माजी नगराध्याक्ष राजेद्रं सोनवणे आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की माझ्या कार्यकाला मध्ये कोपरगाव शहरात भव्य असे महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्यासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्यांन सोबत राहुन काम मार्गि लावले आणी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार खऱ्या अर्थाने समाजातील तळागाळातील समाजबांधवान पर्यत पोहचावे या साठी सगळ्यानी प्रयत्न करावे असे सोनवणे शेवटी म्हणाले यानंतर कोपरगाव ग्रामिण पोलीस स्टेशनचे पो.नि दौलतराव जाधव म्हणाले की संविधानातील तत्वांची पालन करणे हीच देशसेवा आहे लोकांना हक्क व कर्तव्य याची जाणीव होऊन आपला देश नक्कीच बलशाही होईल संविधानातील तरतुदी ला अनुसरून नागरिकांनी काम करावे संविधानाने दिलेले अधिकार समजून घ्या आणि इतरांनाही आधार द्या सविधान हे नागरिकांनी नागरिकांसाठी बनवलेले आहे त्यात प्रत्येकाच्या उन्नतीचा मार्ग आहे ते समाजात भेद निर्माण न करता सर्वांना बरोबरीने वागण्यास सांगते संविधानाने प्रत्येकाला मूलभूत अधिकार व कर्तव्ये दिली आहेत त्याचे सर्वांनी काटेकोरपणे पालन केले तर खऱ्या अर्थाने आज आपण सविधान दिन साजरा केल्याचे सार्थक होईल
याप्रसंगी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते संपतराव भारुड बाजीराव रणशुर नानासाहेब जगताप अशोक शिंदे घटनाकार मैत्री संघाचे गौतमराव बनसोडे ,लहुजी टायगर सेनेचे संस्थापक शरद त्रिभुवन,अल्ताफ शहा,बहुजन समाज पार्टीचे माधव त्रिभुवन ,एकलव्य आदिवासी परिषदेचे संस्थापक मंगेश औताडे,सामाजिक कार्यकर्ते निसार शेख,राजमाता पतसंस्थेचे चेअरमन माजी नगरसेवक अशोक लकारे पत्रकार पंडीतराव भारुड,काँग्रेस अनुसूचीत सेलचे शहराध्यक्ष रवींद्र साबळे नानासाहेब मोरे पत्रकार अजय विघे पत्रकार बिपिन गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण साबळे इंजिनीयर राज दिवेकर गणेश रणशूर बाळू गांगुर्डे सर,बालरक्षक रमेश निकम सर महेंद्र विधाते सर अल्ताफ शहा,प्रकाश दुशिंग, संतोष जगताप कुणाल कीर्तिकर आदिल शेख वसीम शेख बाबासाहेब सातुरे सुनील वाहुळकर विशाल आव्हाड,नितिन शिंदे,शंकर बिर्हाडे, विकी वानखेडे,अॕड.अमोल मगर राजेंद्र घोडेराव गौतम वाव्हुळ वासिम शेख,युनुस शेख,विकास खळे ,जय हिंद विचार मंचचे संस्थापक किशोर चोरगे,बाबासाहेब सातुरे,आंबेडकरी चळवळीतले सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंदे.मिलिंद पाडव,भारत मुक्ती मोर्चाचे अजित झोडगे,पत्रकार संतोष जाधव,राजु दिवे, भाऊसाहेब भालेराव सुजल चंदनशिव सोमनाथ ताकवले
योगेश कोळगे, बाळु वैद्य,शरद खरात,नानासाहेब रोकडे,सोनु देसाई,नरेश,मांजरे,नानासाहेब मोरे,बाजीराव रणशूर,यांच्यासह अनेक नागरिक व समाजातील कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!