Tuesday, March 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोदावरी कालव्यांना रब्बीला 3 तर उन्हाळ हंगामासाठी ४ पाटपाण्यांची आर्वतने द्यावी !!-...

गोदावरी कालव्यांना रब्बीला 3 तर उन्हाळ हंगामासाठी ४ पाटपाण्यांची आर्वतने द्यावी !!- बिपीनदादा कोल्हे.

कोपरगाव प्रतिनिधी

             बारमाही गोदावरी कालवे येथील शेतक-यांच्या शेतीचा मुख्य श्वास आहे, मात्र गेल्या 2 वर्षापासून पर्जन्यमान शंभर टक्के, धरणे पाण्यांने तुडुंब भरलेली असतांनाही त्याचे वारंवार नियोजन बिघडवले जाते, तेव्हा या हंगामात गोदावरी कालव्यांना रब्बीसाठी ३ तर उन्हाळ हंगामासाठी ४ आर्वतने देऊन कालवे दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम आखावा अशी मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी जलसंपदा विभागाकडे व नाशिक पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. खरीप काळात पाऊस असल्याने पाण्यांची आर्वतने वाचलेली आहे, तेव्हा पाटपायांचा खेळखंडोबा होणार नाही याची काळजी घ्यावी असेही ते म्हणाले. श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, मराठावाडा जायकवाडीसाठी खरीपाला 3 आणि उन्हाळसाठी ५ अशी आवर्तने दिली जातात मग गोदावरी कालवे लाभधारक शेतकयावस्च का अन्याय केला जातो. उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील दारणा, गंगापुर कडवा, आलंदी पालखेड काश्यपी, गौतमी, वालदेवी मुकणे, भाम, भावली, वाकी ही धरणे तुडुंब भरतात शिवाय समन्यायी २००५ कायद्याअंतर्गत जायकवाडीसाठी त्यांचे हक्काचे पाणी सोडले जाते मग बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय करून त्यांना हक्काचे पाण्यापासून वंचित ठेवले जाते हे बरोबर नाही. दर वेळी आम्हीच कालवा सल्लागार समितीची बैठक व पाटपाणी आर्वतनाची मागणी करायची, पाटबंधारे खाते आणि ज्यांची जबाबदारी आहे ते गप्प बसुन शेतकऱ्यांचा आक्रोश पाहतात हे चुक आहे. गोदावरी कालवे नफ्यातील आहे मात्र त्याच्या दुरुस्तीसाठी पुरेशा प्रमाणात निधी दिला जात नसल्याने १०० वर्षे आर्युमान होऊनही कालव्यांची कामे रखडवली जात आहे तेव्हा त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून कालवे दुरुस्तीची कामे १०० टक्के तातडीने पूर्ण करावीत. तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याशी समन्वय साधून भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी २०१४ ते २०१९ कार्यकाळांत गोदावरी कालव्यांच्या पाटपाण्यांचे व्यवस्थीत नियोजन केले. जिरायती भागातील शेतकऱ्यांना वरदान असलेले निळवंडे धरण व कालव्यांच्या कामांना गती दिली. नांदूरमध्यमेश्वर जलद कालवा वितरीका एक व दोन साठीचे भुरुपादन प्रस्तावातील त्रूटी दूर करून शेतकर्यांना वाढीव दराने रक्कम मिळवून दिली व नगर नाशिक विरुद्ध मराठवाडा पाण्यांचा प्रादेशिक वाद समन्वयाने सोडविण्यांचा प्रयत्न केला आहे. गोदावरी कालव्यांत काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांना पाटपाणी मिळवतांना अडचणी येतात, टेल टु हेड पाण्यांचे नियोजन बिघडवले जाते, तेव्हा आवर्तनापूर्वी गोदावरी कालव्यांची सफाई नाशिक पाटबंधारे विभागाने करावी, शेतीचे पाण्यांबरोबरच, पिण्यांचे पाण्यांचेही नियोजन चांगल्या प्रकारे करावे, आवर्तन काळात कालव्यांवर पुरेशा प्रमाणात कालवा निरीक्षक, अधिकारी वर्ग नेमावा जेणेकरून शेतकऱ्याना पाण्यांचे आर्वतन मिळण्यांत अडचणी येणार नाही. सन २०१६ पासुन ते २०२१ या काळात दारणा, गंगापुर, मुकणे अन्व धरणiत पाण्याचा साठा पुरेपूर आहे, कोपरगाव, ब्राह्मणगाव, पढेगांव परिसरातही पर्जन्यमान सुमारे ४५० मिलीमिटर सरासरी झालेले आहे तेव्हा गोदावरी कालव्यांना रब्बीसाठी 3 व उन्हाळसाठी ४ पाटपाण्याचे आवर्तने द्यावीत, जेणेकरून शेतकऱ्यांचे पीक लागवडीचा चुकणार नाही असेही बिपिनदादा कोल्हे शेवटी म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!