Tuesday, March 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय संविधान हीच खरी देशाची ताकद!! - दिपकराव गायकवाड

भारतीय संविधान हीच खरी देशाची ताकद!! – दिपकराव गायकवाड

कोपरगाव प्रतिनिधी

भारत देशात विविध जाती,धर्म आणि भाषा असणारे लोक गुण्या गोविंदाने एकत्र राहतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित भारतीय संविधानामुळेच हे शक्य आहे. त्यामुळे भारतीय संविधान हीच खरी आपल्या देशाची ताकद आहे, असे प्रतिपादन आर पी आय (आठवले) चे प्रदेश सचिव तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष दिपकराव गायकवाड यांनी केले. जेऊर कुंभारी येथे डॉ. बाबसाहेब आंबेडकर स्मारक मैदानात आर पी आय चे वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
त्या प्रसंगी बोलतांना गायकवाड पुढे म्हणाले की भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना काही अधिकार दिलेले आहेत तसेच काही कर्तव्ये व जबाबदाऱ्या देखील आहेत. तरी प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या अधिकाराप्रमाणे आपले कर्तव्य व जबाबदारीप्रती जागरूक असणे आवश्यक आहे.
डॉ.बाबसाहेब आंबेडकर स्मारकास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. सनदी लेखा परीक्षक भास्कर वकोडे, ग्रामपंचायत सदस्य प्रदिप गायकवाड, दाविद धीवर यांनी यावेळी भारतीय संविधान आणि त्याचे महत्व या विषयावर आपले विचार व्यक्त केले.
यावेळी स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबुराव काकडे, चांगदेव गायकवाड,दिलीप काकडे, संजय भालेराव, पांडुरंग खरात, शिवराम गायकवाड, बाबु पवार, आनंद चव्हाण, भीमराव वरशिळ, कोंडीबा काकडे, संजय आव्हाड, विमलबाई वरशिळ, गवई ताई,कोळी ताई यांचेसह आर पी आय आठवले प्रणित भीमसाम्राज्य सेनेचे शाखा अध्यक्ष सागर गायकवाड, कार्याध्यक्ष सुमित पगारे, सचिन गायकवाड, अवि पगारे, पप्पू गायकवाड यांचेसह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!