Tuesday, March 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाराष्ट्र राज्य वासुदेव जोशी समाजाच्या राज्यकार्यकारीणीवर कोपरगांव पदाधिकाऱ्यांची निवड भाजपा तर्फे...

महाराष्ट्र राज्य वासुदेव जोशी समाजाच्या राज्यकार्यकारीणीवर कोपरगांव पदाधिकाऱ्यांची निवड भाजपा तर्फे सत्कार.!!

कोपरगाव प्रतिनिधी

           महाराष्ट्र राज्य वासुदेव जोशी समाजाच्या राज्यकार्यकारीणीवर कोपरगांव शहरातील पदाधिकाऱ्यांची निवड झाली. या नविन पदाधिकाऱ्यांचा सत्कार महाराष्ट्र प्रदेश सचिव स्नेहलता  कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात  कार्याअर सत्कार करण्यात आला भाजपा ज्येष्ठ सेलचे शहराध्यक्ष श्री.विष्णुपंत गायकवाड हे अध्यक्षस्थानी होते. वासुदेव जोशी समाज समितीचे जिल्हा सरचिटणीस दीपक सुपेकर प्रास्ताविक करताना म्हणाले की, राज्य समितीचे अध्यक्ष श्री.दिलीपराव परदेशी यांच्या नेतृत्वाखाली वासुदेव जोशी समाजाचे कामकाज चालु असुन संपुर्ण महाराष्ट्रात 252 शाखा कार्यरत झाल्या आहेत. त्यात अहमदनगर जिल्ह्यात 33 शाखा कार्यरत झाल्या आहे. आम्ही समिती मार्फत समाज घटकासाठी समाज कार्यकरत असतो, वधु-वर सुचक मेळावे आणि केंद्र व राज्यसरकार यांच्या विविध योजनांची माहिती समाज घटकापर्यंत पोहचविण्याचे काम करतो आणि सामाजीक उपक्रम राबवितो. भाजप शहराध्यक्ष दत्ता काले याप्रसंगी बोलताना म्हणाले की, जोशी समाज पुर्वी अशिक्षीत असल्याने भटकंती करत फिरत होता, परंतु भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या अधिकाराचा वापर करुन आज समाजात आपण चांगले शिक्षण घेवुन उच्चपदावर नोकरी करत आहात. चांगले क्षेत्रात व्यवसाय करत आहात याचे मनस्वी समाधान वाटते. मााजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनीही या पदाधिकारी निवडीीबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.  सत्कारास उत्तर देताना श्री.निलेश काकडे व श्री.रविंद्र सुपेकर म्हणाले की, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे व सर्व भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी यांनी केलेल्या सत्कार विषय स्मरणात राहील.याप्रसंगी सर्वश्री. जनार्दन कदम, शिवाजी खांडेकर, दादासाहेब नाईकवाडे,  सोमनाथ म्हस्के, मुक्तार पठाण, किरण सुपेकर, संदिप देवकर, गोपी गायकवाड, सोमनाथ म्हस्के, देवराम पगारे, निलेश बोऱ्हाडे, जगदिश मोरे,संतोष नेरे, खालीकभाई कुरेशी, फकिरमंहमद पहिलवान, शरद त्रिभुवन, प्रसाद पऱ्हे, निलेश सावंत,रोहन दरपेल, सागर राउत,समीर सुपेकर, सुनिल मुंगसे, संजय तुपसुंदर ,शंकर बिऱ्हाडे,आसिफभाई पठाण आदी उपस्थित होते. आभार महावीर काले, सूत्रसंचालन सुशांत खैरे यांनी केले. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!