Tuesday, March 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोपरगावात शेतक-यांच्या वीज जोडण्या तोडुन पोटावर मारू नका!! -रोहोम.

कोपरगावात शेतक-यांच्या वीज जोडण्या तोडुन पोटावर मारू नका!! -रोहोम.

 कोपरगाव प्रतिनिधी

            राज्यातील महायुतीचे सरकार आणि उर्जामंत्री व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी शेतक-यांची कुचेष्टा करून त्यांच्या वीज जोडण्या थकीत वीज बिलाअभावी तोडण्याचा सपाटा लावला आहे तेंव्हा वीज वितरण कंपनीने शेतक-यांच्या ऐन रब्बी हंगामातील मोसमात असे टोकाचे पाउल उचलु नये अन्यथा याविरूध्द रस्त्यावर येवुन संघर्ष करावा लागेल असा इशारा कोपरगांव तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी दिला आहे. वीज बिल थकले म्हणून पुरवठा तोडण्यांची मोहिम कोपरगाव मतदार संघात एकीकडे सुरू आहे तर पाच महिन्यांपासुन शेतक-यांचे नादुरूस्त वीज रोहित्र दुरूस्त होवुन मिळत नाही अशा दुहेरी संकटात येथील शेतकरी सापडला असुन अजब तुझे महायुतीचे सरकार अशी म्हणण्याची पाळी आली आहे. श्री. साहेबराव रोहोम यांनी यासंदर्भात शासनांस व उर्जामंत्री नितीन राउत, पालकमंत्री हसन मुश्रीफ, नाशिक येथील वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता, संगमनेर येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्र दिले असुन गेल्या दोन वर्षापासुन कोपरगांव विधानसभा मतदार संघात अवकाळी पावसामुळे खरीप व रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे, त्याची भरपाई शासनाने तुटपुंज्या प्रमाणात दिली आहे तर अद्यापही काही शेतक-यांच्या खात्यावर ही भरपाईची रक्कम जमा झालेली नाही. कोरोना महामारीचे संकट आणि दुसरीकडे चालु हंगामात खरीप पिकाचे पुन्हा झालेले नुकसान या कचाटयात शेतकरी सापडला आहे. भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांना मतदार संघातील शेतक-यांचे शिष्टमंडळ भेटुन त्यांनी याबाबतच्या व्यथा त्यांच्यापुढे मांडल्या आहेत, त्यांनीही वीज वितरण खात्याच्या अधिका-यांकडे व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे या प्रश्नाची कड लागावी म्हणून विनंती केलेली आहे, रब्बी हंगाम आता एैन मोसमात आहे त्यासाठी शेतकरी स्वत:जवळील तसेच पत्नीचे दाग दागिने गहाण ठेवुन कर्ज काढुन पीक लागवडीची तयारी करत आहे, उशीरा पर्जन्यमान झाल्याने विहीरींनाही पाणीही बरे आहे पण वीज वितरण कंपनीने या शेतक-यांना कुठल्याही प्रकारची आगावू सुचना न देताच त्याचेकडे थकीत वीज बिलाची रक्कम मागणी न करताच परस्पर वीज रोहित्राचा पुरवठा खंडीत करून शेतक-यांना वा-यावर सोडुन त्यांच्या पोटावर मारण्यांचा सपाटा लावला आहे, वीज खंडीत झाली तर शेतकरी रब्बी पिक लागवडीस पाणी देवु शकणार नाही, पाणी मिळाले नाही तर त्याचे उत्पन्न काहीच निघणार नाही, परिणामी अन्य नगदी पिकांचे नुकसान होईल, त्याच्या दैनंदिन खर्चाची तोंडमिळवणी तो करू शकत नाही यासाठी शासनस्तरावर धोरणात्मक निर्णय घेवुन तात्काळ वीज रोहित्रांचा पुरवठा खंडीत करण्यांची मोहिम स्थगित करावी, कोरोना परिस्थिीतीमुळे बहुतांष शेतक-यांचे आर्थीक गणित कोलमडुन पडले असुन त्यांच्याकडील संपर्काचे भ्रमणध्वनीही पैसे नसल्यामुळे बंद पडले आहेत अशा परिस्थितील राज्य वीज वितरण कंपनीने पाठविलेले वीज बिलांचे संदेशही शेतक-यांपर्यंत पोहोचलेले नाहीत असे सांगुन श्री. साहेबराव रोहोम पुढे म्हणाले की, कोपरगांव मतदार संघातील भोसले (वेळापुर) वीज रोहित्र, मोहनतात्या वाबळे (सुरेगांव) वीज रोहित्र, शिंदे (हंडेवाडी) रोहित्र, विनोद सोनवणे (सोनारी) रोहित्र, गांवठाण वीज रोहित्र (सोनारी), चरमळ वीज रोहित्र (पढेगांव), धोंडेवाडी काकडी वीज रोहित्र यासह अनेक वीज रोहित्र चार ते पाच महिन्यांपासुन जळीत होवुन बंद आहेत ते दुरुस्तीसाठी वीज वितरण कंपनीकडे पाठवुनही त्याची अद्यापही दुरूस्ती झालेली नाही, त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभाराबददल येथील शेतक-यांमध्ये मोठया प्रमाणांत असंतोष पसरला आहे त्याचा उद्रेक कधी होईल याचा नेम नाही तेंव्हा वीज वितरण कंपनीने येथील वस्तुस्थिती समजावुन घेवुन वीज पुरवठा खंडीत करण्यांची मोहिम थांबवावी व पाच महिन्यापासून बंद असलेले वीज रोहित्र तात्काळ संबंधीत ठिकाणी लावुन वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा याविरूध्द नाईलाजास्तव रस्त्यावर येवुन संघर्ष करावा लागेल असा इशारा शेवटी साहेबराव रोहोम व त्यांच्या सर्व भाजपा सेलच्या पदाधिका-यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!