Tuesday, March 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रसंत जनार्दन स्वामींचे शिष्य रमेशगिरी महाराजांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने अभिष्टचिंतनानिमीत्त सत्कार

राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचे शिष्य रमेशगिरी महाराजांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने अभिष्टचिंतनानिमीत्त सत्कार

कोपरगाव प्रतिनिधी

           राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांनी अध्यात्माची सांगड श्रमदानाबरोबर घालुन त्यातुन धार्मीकता जोपासण्याचे मोठे काम केले त्यांचाच वारसा शिष्य.  प. पू. रमेशगिरी महाराज हे पुढे चालवत असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.   प.पू रमेशगिरी महाराज यांचा ६७ वा अभिष्टचिंतन सोहळा व काकडा समाप्ती औचित्य साधत संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, , भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी फाउंडेशनचे सुमितदादा कोल्हे यांच्या हस्ते कोपरगांव बेट भागातील जनार्दन स्वामी समाधी मंदिर स्थळावर सामुदायिक महाआरती, षोडशोपचार पाद्यपुजा सोमवारी पार पडली त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक अरूण येवले, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे उपाध्यक्ष दत्तात्रय होळकर, विश्वस्थ अनिल जाधव, विलास कोते, कामगार नेते मनोहर शिंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, दत्तगिरी महाराज (वैजापुर), राघवेश्वर महाराज (कुंभारी), गुलाबगिरी महाराज (दहेगांव), हभप खरात महाराज (वावी), संदिपगिरी महाराज (येवला), सोपान विखे, चांगदेवराव कातकडे, दिपक कोटमे, साईनाथ खिरडकर, विष्णुपंत कोल्हे, संदिप शिंदे, डॉ चोळके, डॉ गवळी, उत्तम चरमळ माजी सभापती सुनिल देवकर, सुभाष जोर्वेकर, नाना लोंढे, माणिक वक्ते, मधुकर चव्हाण, किरण वक्ते, बापू चव्हाण, कानिफनाथ वक्ते, सुभाष निर्मळ यांच्यासह विविध संस्थाचे आजी माजी पदाधिकारी, पंचकोशीतील भजनी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.  सौ. स्नेहलता कोल्हे यांनी देखील रमेशगिरी महाराजांचा सत्कार करत कोरोना काळात रमेशगिरी महाराजांची उर्जा मिळाली म्हणूनच आपल्यावरील दिव्य संकट टळले. जनार्दन स्वामींबरोबरच त्यांच्या दर्शनाने मनातील सगळा ताणतणाव दुर होतो असे सांगितले. श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे आणि राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे एक अतुट नाते आहे. कोपरगांव बेट ही भूमि ऐतिहासिक आणि पौराणिक धार्मिक वारसा परंपरेची असून गुरू शुक्राचार्य, कचेश्वर देवयानी, चांगदेव महाराज, संत ज्ञानेश्वर, नामदेव, सोपान, मुक्ताई आदिबरोबरच कोकमठाणचे ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांची कर्मभूमी असुन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांनी त्यांच्या तपसाधनेत श्रमदानातुन काशिविश्वेश्वर महादेव मंदिराचे निर्माण करून अध्यात्माचा पाया महानिर्वाणानंतर याठिकाणी त्यांचे भव्यदिव्य समाधीमंदिर उभे राहिले. मौनगिरी जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख स्व. मोहनराव चव्हाण यांनी जनार्दन स्वामींच्या विचारांची ध्वजपताका संपुर्ण महाराष्ट्र राज्यात पेरून या कार्याला मोठे बळ दिले.एकादशी चार्तुमास समाप्तीनिमीत्त जयबाबाजी भक्त परिवार कोपरगांव बेट, आकाश देवकर (कोल्हार), उदावंत बंधु (पुरणगांव), सरपंच सुनिता भिमा संवत्सरकर (शिंगणापुर) किशोर पानगव्हाणे, अरूण बोडखे (नाशिक) यांनी महाप्रसादाचे वाटप केले. जनार्दन स्वामींसह रमेशगिरी महाराजांचे दर्शन आणि अकरा एकादशीचा कृपाप्रसाद आपल्याला मिळाल्याचा अनुभव हभप खरात महाराज (वावी) यांनी यावेळी बोलून दाखविला. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे शिष्य प.पू रमेशगिरी महाराज यांचा ६७ वा अभिष्टचिंतन सोहळा व कार्तिक काकडा चार्तुमास समाप्तीचे औचित्य साधत संजीवनी उद्योग समुहाच्यावर्तीने रमेशगिरी महाराजांचा जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!