
कोपरगाव प्रतिनिधी
गेल्या वर्षापेक्षा चालू वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कांद्याचे रोप टाकून उशिरा कांद्याची लागवड करण्यापेक्षा कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील शेतकऱ्यांनी कांदा पेरणी पसंत केली. त्यामुळे कांदा लागवडीवर होणारा खर्च कमी झाला.जेऊर कुंभारी परिसरातील माजी सरपंच यशवंत आव्हाड यांच्या सहा एकर शेतामध्ये यांत्रिकी साधनांच्या साह्यांने कांदा पेरणी पसंत केली आहे.
कांदा बियाणे यावर्षी १० हजार रुपये पाहिली गेला आहे. कांदा बियाणाचा एवढा भाव वाढल्यामुळे बियाण्यापासून रोपे तयार करून लागवडीचा खर्च शेतकऱ्यांना काही परवडण्यासारखा नाही रोपे टाकून कांदा लागवड करण्यापेक्षा कांदा पेरणी कडे लक्ष दिले जात आहे. या अगोदर चांदेकसरे, जेऊर कुंभारी डाऊच खुर्द, घारी, पोहेगाव या भागातील शेतकऱ्यांनी कांदा पेरणी केली आहे त्यामुळे यावर्षी जेऊर कुंभारी पंचक्रोशीत ६० टक्के शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कांदा पेरणी केली. कांदा पेरणीतून एकरी
दोनशे क्विंटलपर्यंत उत्पन्नाची अपेक्षा आहे असे शेतकरी माजी सरपंच यशवंत आव्हाड यांनी सांगितले.


