Tuesday, March 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedके बी पी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याचा २३ वर्षांनंतर रंगला स्नेहमेळा

के बी पी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याचा २३ वर्षांनंतर रंगला स्नेहमेळा

 एक हात मदतीचा मित्रांसाठी नावाने जमविला निधी

 कोपरगाव प्रतिनिधी

          अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता समाज माध्यमही बदललं आहे. धकाधकीच्या जीवनांत जो तो सोशलमिडीयावर हाय, हॅलो करतो, पण ग्रामीण भागातील मुल मुलीं शिक्षणांतून प्रगल्यभ होऊन स्तिर होतात, कोपरगांव के बी पी विद्यालयाच्या १९९७-९८  दहावीच्या ५० माजी विद्यार्थ्यांची बॅच दिवाळीनिमीत्त कोपरगावी एकत्र आली आणि त्यातून आपल्याच अडचर्णीत असलेल्या मित्र बांधवासाठी एक हात मदतीचा या नावाने निधी जमवत आर्थीक परिस्थितीने गांजलेल्यांसाठी प्रत्यक्षपणे देवदुत म्हणून उभे राहिले आहेत त्यासाठी सोमनाथ रंगनाथ परजणे (संवत्सर) या माजी विद्यार्थ्याने पुढाकार घेत ही संकल्पना राबविली. मित्र परिवाराच्या या बॅचमध्येच शिक्षण घेणारे प्रकाश आदमाने आता लंडन येथे सॉफटवेअर अभियंते म्हणून काम करतात त्यांनी थेट व्हीडीओ कॉलद्वारे मित्रपरिवाराशी संवाद साधत जुन्या आठवणींना तब्बल २३ वर्षानंतर उजाळा दिला.दहावी आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर शाळेमध्ये असलेले वर्गमित्र एकमेकांपासून दुर होतात.   कुणी अभियंते, वकील, डॉक्टर, सैन्यदलात मेजर, कारखानदार, शेतकरी कष्टकरी, नोकरदार, छोटे मोठे व्यावसायिक होतात आणि त्यांच्यातील दुरावा वाढु लागतो. आई वडील आणि ज्या शिक्षणामुळे आपण छोटयाचे मोठे झालो त्याच्या आठवणी या स्नेहमेळाव्यात डॉ. साहिल खोत (पोहेगांव ग्रामिण रूग्णालय), डॉ. वाल्मीक नेहे (राहाता ग्रामिण रुग्णालय), डॉ. प्रमोद घोगरे (मुंबई), विक्रम सोनवणे (मेजर), प्रमोद आव्हाड (मेजर), नितीन डुबे (मेजर), सागर शहा (केमिकल उद्योजक), शंकर कोकाटे, नवनाथ सोमासे, राहुल गरकल यांच्यासह अनेक मित्र मैत्रिणींनी ताज्या केल्या. कोरोना महामारीचे संकट आणि त्यातुन वाढलेल्या परिवाराच्या गुंतागुंत, आर्थीक प्रश्न, एकमेकांची सुख-दुःखे यानिमीत्तनि बाहेर येत त्यावर सांगोपांग चर्चा झाली. मैत्रीचा हा स्नेहमेळावा आपल्यातील अडचणीत असलेल्यांच्या जीवनांत आधार ठरावा म्हणून सोमनाथ परजणे यांनी एक हात मदतीचा मित्रांसाठी संकल्पना सादर केली आणि क्षणार्धात त्यास उपस्थित मित्र परिवारांनी प्रत्येकी एक हजार रूपये आर्थीक मदत करत चाळीस हजार रूपयांची जमवाजमव केली. तत्कालीन मुख्याध्यापक श्री. पैठणे सर, पर्यवेक्षक सोनवणे सर यांच्यासह शिक्षक वृंदांच्या आठवणींवर चर्चा झाली. झरेकर सर यांना केंद्रस्थानी मानून या तेवीस वर्षापुर्वांच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. वर्गमित्र कितीही मोठे झाले तरी त्यांनी आपसातील मैत्री कधी विसरायची नाही. अडचणीत सापडलेल्या मित्राला आधार द्यायचा हा संदेश घेत या स्नेहपरिवाराने निरोप घेतला, शेवटी सागर शहा यांनी आभार मानले.कोपरगांव येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या १९९७-९८ च्या पन्नास माजी विद्यार्थ्यांनी दिवाळी फराळानिमीत्त एकत्रीत येत आठवणींना उजाळा देत एक हात मदतीचा मित्रासाठी उपक्रमाची स्थापना केली

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!