
कोपरगाव प्रतिनिधी
आर्थिक संकटामुळे एस टी कर्मचारी आत्महत्या करून बळी जात असताना दुर्दैवाने शासन आर्यन चा बळी जाऊ नये या चिंतेत व्यस्त आहे असे परखड मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले
गेल्या दोन वर्षांपासून करोना साथीच्या आजाराने सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली होती त्यामुळे एस टी कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत त्यामुळे एस टी महामंडळाचे कर्मचारी यांना निमशासकीय सेवेतून शासकीय सेवेत वर्ग करावे अशी मागणी कर्मचारी करत आहे दिवाळी मध्ये बोनस च्या नावाखाली कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासनाने केले आहे त्या मुळे कर्मचाऱ्यांनी बंद चे हत्यार उपसले आहे ऐन दिवाळी सणामध्ये कर्मचाऱ्या च्या मागण्या कडे सरकार दुर्लक्ष करत आहे पेट्रोल डिझल ची वाढती महागाई व रस्त्याची बिकट परिस्थिती यामुळे नागरिकांनी एस टी सारख्या सार्वजनिक सेवेचा पर्याय निवडला आहे दिवाळी सणामध्ये अनेक जण आपल्या गावाकडे जात असतात तर माहेर वासींनी एस टीने हक्काचा प्रवास करत असतात मात्र एस टी कर्मचाऱ्याच्या संपामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे दिवाळी काळात एस टी कडे प्रवाशांचा ओघ असतो त्यातून एस महामंडळाला चांगले आर्थिक उत्पन्न मिळते मात्र शासनाचा कोणताच प्रतिनिधी या प्रश्नाकडे व कर्मचाऱ्यांच्या मागण्या कडे गांभीर्याने पहात नाही आर्थिक संकटामुळे एका बाजूला एस टी कर्मचाऱ्यांचे आत्महत्येचे टोकाचे पाऊल गाठून बळी जात आहे तर दुसरीकडे सरकार आर्यन चा बळी जाऊ नये म्हणून कसरत करण्यात गुंग आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या अनेक कामगार संघटना आहे त्यात कामगार सेना,इंटक या सरकार प्रणित राजकीय पक्षांच्या संघटना आहेत मात्र वर्षभर या संघटनेच्या माध्यमातून कामगारांकडून फंड गोळा केला जातो मात्र कामगारांच्या न्याय हक्कासाठी या संघटनांनी सरकार वर दबाव टाकणे आवश्यक आहे मात्र हे होताना दिसत नाही एका एस टी कर्मचाऱ्याचा मुलगा म्हणून मला या प्रश्नांची दाहकता माहीत आहे त्या मुळे शासनाने त्वरित निर्णय घेऊन एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा असे या पत्रकात म्हटले आहे.


