
कोपरगाव प्रतिनिधी
औरंगाबाद शहरापासून जवळ असलेल्या व २५० वर्षे पुरातन १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेरच्या पंच पदावर कोपरगांव येथील सकल जैन समाजाचे विशाल ताराचंद बडजाते व सुयोग चंपालाल ठोळे यांची नुकतीच निवड झाल्याबदल त्यांचा भाजप व संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला., बडजाते व ठोळे यांनी या क्षेत्राची अधिक महती वाढवुन जैन बांधवांच्या दुर्लक्षित समस्या सोडविण्यांस प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा सौ. कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी शहराध्यक्ष डी.आर.काले, अमृत संजीवनीचे अधक्ष्र पराग संधान, अतुल काले, कोल्हे कारखान्याचे संचालक प्रदिप नवले, सेनेचे कैलास जाधव, महावीर दगडे, राजेंद्र सोनवणे, सेनेचे गट नेते योगेश बागुल, नरेंद्र डंबीर, शिवाजी खांडेकर, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश पाठक, माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, विक्रमादित्य सातभाई, सागर जाधव, रविंद्र कथले, सोमनाथ आहिरे, सुकुमार लोहाडे, दादाभाऊ नाईकवाडे, रविंद्र रोहमारे, निलेश बोऱ्हाडे, महेंद्र नाईकवाडे, गोपीनाथ गायकवाड, अशोक लकारे, जगदिश मोरे, चंद्रकांत वाघमारे, यश काळे, किरण सुपेकर, सिद्धार्थ शेळके, शाम आहेर, विनोद (पिंकी) चोपडा, पप्पु पडियार, रंजन जाधव, खालीकभाई कुरेशी, फकीर मंहमद पहिलवान, मोहीत गंगवाल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.औरंगाबाद चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेरच्या पंच पदावर कोपरगांव येथील सकल जैन समाजाचे विशाल ताराचंद बडजाते व सुयोग चंपालाल ठोळे यांची निवड झाल्याबदल त्यांचा भाजप व संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.


