Monday, March 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोपरगावच्या उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करू!! - आ.आशुतोष काळे

कोपरगावच्या उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करू!! – आ.आशुतोष काळे

            कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव  शहरात निर्माण झालेल्या पाणी व रस्त्यांच्या समस्यांमुळे बाजारपेठेत होणारी आर्थिक उलाढाल थंडावली आहे. शहराच्या व्यापाऱ्यांना येत असलेल्या पाणी व रस्त्यांच्या समस्या सोडवून कोपरगावच्या उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करून व्यापाऱ्यांची जास्तीत जास्त आर्थिक उन्नती कशी होईल यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व कोपरगाव शहरातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांना शासकीय मदत मिळवून दिल्याबद्दल कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव शहराला नियमित पाणी मिळावे अशी शहरातील प्रत्येक नागरिकांची अपेक्षा आहे. त्यामुळे निवडून येताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या मदतीने पाच नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील काम पूर्ण करण्यासाठी समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीला भाग पाडले. त्यामुळे कोपरगाव नगरपालिकेची आर्थिक बचत झाली. कोपरगाव शहराच्या विकासासाठी प्रतिकूल परिस्थितीत १२ कोटी आणले असून यापुढील काळात जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. छोट्या मोठ्या व्यवसायात अनेक मोठे उद्योगपती सक्रिय होत असल्यामुळे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून ग्राहकांची देखील फसवणूक होत आहे.व्यापाऱ्यांच्या अशा अडचणी सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या ग्राहक मंत्रालयाच्या माध्यमातून या अडचणी सोडवून शहरातील पाणी व रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली.यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते समता पतसंस्थेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘सोने तारण कक्षा’चे उदघाटन करण्यात आले तसेच समता उद्योगसमूहाच्या वतीने सुरू असलेल्या महिला बचत गट उद्योग मंदिराची आमदार आशुतोष काळे यांनी पाहणी केली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा,अजित लोहाडे, प्रदीप साखरे,तुलसीदास खुबाणी, केशवराव भवर,नरेंद्र कुर्लेकर, किरण शिरोडे, गुलशन होडे, व्यापारी महासंघ महिला आघाडी अध्यक्षा सौ. किरणताई डागा, व्यापारी महासंघाचे सर्व सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक मंदार पहाडे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, रमेश गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. आ.आशुतोष काळेंचे शासनामध्ये वजन आहे. आदरणीय पवार साहेबांच्या हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत त्यांची गणती होते. पवार साहेबांकडून त्यांनी पाच नंबरचा प्रश्न चुटकीसरशी सोडवून घेतला. त्यांच्या कामाचा उरक पाहता कोपरगाव शहराचेच नव्हे तर संपूर्ण मतदार संघातील विकासाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. व्यापारी संकुल प्रगतीचा मार्ग आहे त्यामुळे शेजारील तालुक्याच्या नूतन बसस्थानकामध्ये एक हजार व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी गाळे उपलब्ध करून दिले मात्र कोपरगाव शहराच्या नूतन बसस्थानकात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असतांना व्यावसायिकांना गाळे का उपलब्ध करून दिले नाही याबाबत काका कोयटे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांचा सत्कार करतांना कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!