Monday, March 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedसहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्यांच्या कामगारांना बारा टक्के वेतनवाढ लागु!!-विवेक कोल्हे

सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्यांच्या कामगारांना बारा टक्के वेतनवाढ लागु!!-विवेक कोल्हे

 कोपरगाव प्रतिनिधी

           राज्यातील साखर कामगारांच्या वेतनवाढीचा निर्णय झाला असुन सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या कामगारांना बारा टक्के वेतनवाढ लागु करण्यांचा निर्णय तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांनी जाहिर केला.  सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने मागील गळीत हंगामात ऐतिहासिक उच्चांकी गाळप केल्याबददल कर्मचारी अधिकारी यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देवुन त्यांचा गुरूवारी सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते.प्रारंभी एच. आर. मॅनेजर प्रदिप गुरव यांनी प्रास्तविक केले. कामगार नेते मनोहर शिंदे, कामगार संचालक वेणुनाथ बोळीज, गणपतराव दवंगे व त्यांच्या सहका-यांनी विवेक कोल्हे यांचा ऐतिहासिक गाळपाबददल सत्कार करून कामगारांचे प्रश्न मांडले. कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी चालु गळीत हंगामात कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी साडेआठ लाख मे. टन गाळपाचे उददीष्ट ठेवले असुन ते पुर्ण करून साडेअकरा टक्के साखर उतारा मिळविण्यांसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगितले.. याप्रसंगी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, चीफ केमिस्ट विवेक शुक्ला, केन मॅनेजर जी. बी. शिंदे, कंन्ट्रीलिकर सेल्स विभागाचे प्रमुख शहाबाज खान, डेप्युटी चीफ केमिस्ट अनिल राडे, डिस्टीलरी मॅनेजर श्री. जंगले, सचिव तुळशीराम कानवडे, कामगार कल्याण अधिकारी एस सी. चिने, आदि खातेप्रमुख, उपखातेप्रमुख उपस्थित होते.श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, राज्यातील साखर कारखानदारीचे सर्व पायलट प्रकल्प माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सर्वप्रथम संजीवनीत सुरू केले त्याचा इतरांना नेहमीच फायदा झालेला आहे. अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सातत्यांने अत्याधुनिकतेचा ध्यास घेत उपपदार्थ निर्मीतीबरोबरच औषधी उत्पादनांत आत्मनिर्भरतेच्या दृष्टींने पावले टाकली आहे, आणि सहकारमहर्षि कोल्हे कारखान्याने त्यात देशात सर्वप्रथम आघाडी घेतली आहे. मागील हंगामात कारखान्यांच्या सर्वच विभागाने जीव ओतुन काम केल्याने कोल्हे कारखान्यांचे आजवरच्या इतिहासात सर्वोच्च गाळप झाले. चालु हंगामात देखील आपल्या कारखान्याला याही पुढचा टप्पा गाठायचा आहे त्यासाठी सर्वांनी साथ देत तालुक्याच्या कामधेनुचा नांवलौकीक राज्यात वाढविण्यांसाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करावेत. साखर उद्योग हा ग्रामिण अर्थकारणाचा केंद्रबिंदु असुन सभासद, शेतकरी हितचिंतक व त्यावर अवलंबुन असणा-या सर्वच घटकाच्या प्रगतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते शेवटी म्हणाले. सचिव टी आर कानवडे यांनी आभार मानले. सुत्रसंचलन स्वियय सहाय्यक रंगनाथ लोंढे व आयुब पठाण यांनी केले.
सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने मागील गळीत हंगामात ऐतिहासिक उच्चांकी गाळप केल्याबददल कर्मचारी अधिकारी यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देवुन त्यांचा विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी त्यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!