
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुभांरी गावातील नेहमी सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असणारी शिवसुत्र युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली.
सालाबादा प्रमाणे दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा मोठ्या जल्लोषात शिवसुत्र प्रतिष्ठान च्या वतीने साजरी केली जात असते पण मागिल वर्षी कोरोनाचा वाढता प्रभाव मुळे
कोजागिरी पौर्णिमा साजरी करता आली नाही पण यावेळी शासनाचे सर्व नियमांचे काटेकोर पालन करून कोजागिरी साजरी करण्यात आली .
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुधाला विशेष महत्त्व आहे.
यावेळी जेऊर कुभांरी गावचे उपसरपंच जालिंदर यांनी असे सांगितले आजच्या दिवशी रात्री दूध आटवून त्याचा देवीला नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर मित्र मंडळी दूध प्राशन करतात.
अश्विन पौर्णिमेला शरद पौर्णिमा अथवा कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. या वर्षी 19 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. त्यामुळे चंद्रप्रकाश नेहमीपेक्षा लख्ख आणि जास्त असतो. भारतीय परंपरेत कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी चंद्रावरून पृथ्वीवर येते आणि कोण जागत आहे ते पाहते असा समज आहे. चंद्रप्रकाशातील दूध कोजागिरीला पिण्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो हेच कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आहे.त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा महाराष्ट्र मध्ये सर्व भागात साजरी केली जाते त्यांच पार्श्वभूमीवर जेऊर कुंभारी गावात मोठ्या उत्साहाने संपन्न झाली.
यावेळी गावचे उपसरपंच जालिंदर चव्हाण, कल्याण गुरसळ ,भानुदास वक्ते, किरण वक्ते बापूसाहेब वक्ते , यशवंतराव आव्हाड, शशिकांत गुरसळ, काशिनाथ वक्ते राजेंद्र वक्ते, सुनील वक्ते, पोलीस पाटील बाळासाहेब वक्ते, अनिल वक्ते, प्रदिप गायकवाड, नवनाथ गायकवाड, मधुकर वक्ते, शशिकांत वक्ते,
पांडुरंग वक्ते, आदी सह ग्रामस्थ व शिवसूत्र युवा प्रतिष्ठान चे सर्व सदस्य उपस्थिती होते.



