Monday, March 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिवार फेरीतून वाढली कृषी उत्पादनाची जिदद, कोपरगावच्या शेतकऱ्यांनी साधला सुरगाणा घागबारीशी संवाद!!

शिवार फेरीतून वाढली कृषी उत्पादनाची जिदद, कोपरगावच्या शेतकऱ्यांनी साधला सुरगाणा घागबारीशी संवाद!!

कोपरगाव प्रतिनिधी

           कृषी उत्पादकता वाढुन पीक बदल झाला पाहिजे, असा टाहो सर्वांचच असतो पण नेमकेपणाने काय केलं म्हणजे पीक जोमात येते याबाबतचे मार्गदर्शन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात मिळाले तर त्यातून चार गोष्टी शिकता येतात आणि हेच नेमकेपणाने कोपरगांव तालुक्यातील मुर्शतपुर येथील जय वीर हनुमान प्रगतशील शेतकरी गटाने जळगांव येथील तेलबिया संशोधन केंद्राचे कृषितज्ञ पोपटराव खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली थेट शिवार फेरी अं अभ्यास दौरा अंतर्गत सुरगाणाा तालुक्यातील घागबारी येथील शेतक-यांशी संवाद साधत सोयाबीन पीक उत्पादकता वाढ व पीक बदल बाबत माहिती घेतली. अध्यक्षस्थानी तुळशीदास पिठे होते.प्रारंभी तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, मंडल अधिकारी अविनाश चंदन यांनी शासनाच्या योजनाची माहिती देऊन सोयाबीन पीक उत्पादन वाढ कार्यक्रम कसा राबवावा हे सांगितले. कृषी सहाय्यक संगीता सोळसे यांनी तालुक्यातील प्रगतशिल शेतकयांच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. सुरगणा तालुक्यातील घागबारी येथील निखील कृषी सेवा केंद्राचे देवेंद्र गायकवाड यांनी उपस्थीताचे स्वागत करत कृषीतज्ञ पोपटराव खंडागळे यांनी सोयाबीन लागवडीचे टोकण तंत्र समजाऊन सांगितले आणि एका झाडाला ११० ते १७० शेंगा लगडल्या हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले.  
कृषीतज्ञ पोपटराव खंडागळे म्हणाले की, या परिसरात १८०० मिलीमिटर पाऊस पडतो, अशा परिस्थितीत हा प्रयोग यशस्वी होईल की नाही हे आव्हान होते पण देवेंद्र गायकवाड या शेतकऱ्यांने आपल्या मार्गदर्शनाखाली सर्व संकटावर मात करत सोयाबीन पीक पेरणी केली त्यानंतर बेसलडोस, फवारण्या, किड नियंत्रनची माहिती दिली त्यांनी ती आत्मसात करत एकरी १५ ते १८ क्विंटल सोयाबीन उत्पादन घेत यशोगाथा दाखवत पीकबदल उपक्रम यशस्वी करून दाखवत कमाल केली आहे. या शिवारफेरीतील हरीभाऊ शिंदे, रामदास शिंदे, राधाबापू शिंदे, दिलीप शिंदे सुधाकर शिंदे, या शेतकऱ्यांनी त्यांच्या मनातील शंकांचे पोपटराव खंडागळे यांच्याकडून निरसन करून घेतले. घागबारीचे माजी सरपंच भगवान गायकवाड, गावीत शास्त्री, हेमलता गायकवाड, चिंतामण गायकवाड यांनी त्यांचे अनुभव कथन केले. सपाटभागात अति पर्जन्यमानाने सोयाबीनचे नुकसान झाले पण सुरगाणा घागबारीत या सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढून फारसे नुकसान नाही हे दाखवून दिले व पीक बदल यशस्वी करून दाखवला त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुत्रसंचालन नामदेव पवार तर आभार गोपाळराव गायकवाड यांनी केले. मागील खरीप हंगामात पोपटराव खंडागळे यांनी कोपरगाव तालुक्यातील विविध गावात सोयाबीन उत्पादकता वाढ उपक्रम यशस्वी करत असंख्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!